Breaking news
रायवूड भागामध्ये विकासाच्या नावाखाली रस्ते खोदाई; पंधरा दिवसापासून काम बंद, सोमवारपासून या भागातील शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

ठळक बातम्या

लोणावळा

Blood Donation Camp l लोणावळ्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद: ६० युनिट रक्ताचे संकलन; रक्तदात्यांना मिळाले ५ लाखांचे विमा कवच

लोणावळा : 'वर्ल्ड ब्लड डोनर डे' चे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा, हॉटेल रिजेंटा आणि आधार ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, १४ जून २०२६ रोजी हॉटेल रिजेंटा, लोणावळा येथे भ

लोणावळा नगरपरिषदेत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्याची शिवसेनेची मागणी

लोणावळा : मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोणावळा नगरपरिषद सभागृह व कार्यालयात त्यांची प्रतिमा लावण्यात य�

क्राईम-न्युज

Lonavala News l लोणावळ्यात बंगल्यात सुरू असलेल्या 'हाय-प्रोफाइल' धिंगाण्यावर पोलिसांचा छापा; ९ पुरुष, ७ महिलांसह १८ जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा शहरात पर्यटकांच्या गर्दीचा फायदा घेत काही ठिकाणी नियमबाह्य कृत्ये केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लोणावळ्यातील मुख्य भागात असलेल्या 'पुराणिक सोसायटी' मधील एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावून, दारूचे सेवन करत अश्लील कृत्य करणाऱ्या १८ जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ९ पुरुष आणि ७ महिलांसह बंगल्याचा केअरटेकर आणि मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी पहाटे १:३० च्या सुमारास लोणावळा शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना भांगरवाडीतील पुराणिक सोसायटीच्या एका बंगल्यातून मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले. या आवाजामुळे परिसरातील शांततेचा भंग होत होता. पोलिसांनी तातडीने सदर बंगल्यावर छापा टाकला असता, तिथे अनेक तरुण-तरुणी मद्यपान करत असल्याचे आढळले. लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून अश्लील कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसताना मद्य बाळगणे आणि त्याचे सेवन करणे सुरू होते. विशेष म्हणजे, बंगल्याच्या मालकाने पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा बंगला भाड्याने दिला होता, तर केअरटेकरने या कृत्याला सोयीस्कर मदत केली होती.         लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. राहुल चोरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या, रिकामे कॅन आणि आरोपींकडे असलेले महागडे मोबाईल असा एकूण ३ लाख ९० हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.        सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे शहरात विनापरवाना चालणाऱ्या बंगल्यांच्या व्यवसायावर आणि पर्यटकांच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध कृत्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व लोणार शहर चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, रिया राणे, मयुर आबनावे, भुषण कुंवर, राहुल चोरघे, प्रिती गवारी, प्राजक्ता सुतार, सतिश घोंगडे, तुषार शिंदे, सिध्देश्वर शिंदे, आतिष आदलिंगे, तेलंग यांनी ही कारवाई केली.

मावळ

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

तळेगाव दाभाडे : सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.      कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, संस्थेचे अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक,  संचालक अरुण भेगडे, शालेय समिती अध्यक्ष रामराव जगदाळे, संचालक विलास भेगडे तसेच उद्योजक अतिश अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.       यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिशा जामदार हिने 93.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्रणिशा (93.20%) हिने द्वितीय, सार्थक बागुल (91.80%) याने तृतीय, ऋतुजा सोनार (91.20%) हिने चतुर्थ तर संदीप रात्रे (90.80%) याने पाचवा क्रमांक मिळविला.विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात दिशा जामदार (92 गुण), हिंदी विषयात दिशा जामदार (91 गुण), मराठी विषयात साक्षी पाटील (95 गुण), गणित विषयात सार्थक बागुल (99 गुण), विज्ञान विषयात संदीप रात्रे (98 गुण) आणि सामाजिक शास्त्र विषयात सार्थक बागुल (97 गुण) यांनी विशेष प्रावीण्य मिळविले.       यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.       कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमास पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्याध्यापिका रंजीता थंपी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर्षीच्या दहावीच्या मुलांना मार्गदर्शनही केले.

पिंपरी-चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात मोठी घोषणा; सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.बावनकुळे व गौर गोपाल दास यांचा विशेष सन्मान महसूल खात्यात काम करताना ऐतिहासिक व क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा, तसेच आपल्या ओघवत्या वाणीने तरुण पिढीत चैतन्य निर्माण केल्याबद्दल गौर गोपाल दास यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “माझ्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे. समाजाचा आरसा बनवून पत्रकार आम्हाला विविध कामे सुचवतात. चुका दाखवून देतात. त्यामुळे आधी प्रभावी विरोधक म्हणून आम्हाला काम करता आले आणि आता आम्ही लोकाभिमुख राज्यकारभार करून शकत आहोत. पत्रकारांचे राज्याच्या विकासामध्ये योगदान मोठे आहे.” ते पुढे म्हणाले की, पुणे-मुंबई प्रमाणे राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा दिली जाईल. पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतले आहेत तसेच भविष्यातही घेण्यात येतील.“वृत्तपत्र वाचूनच मराठी शिकत आहे” - राज्यपाल यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, “महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून काम करत असताना मी मराठी भाषा देखील शिकत आहे. मराठी वृत्तपत्रांचा मला त्यासाठी उपयोग होत आहे. यावेळी मी इंग्रजीत बोलत असलो तरी पुढच्या वेळी मी मराठीत भाषण करीन.” कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गुणवत्ता अधिक वाढण्यास मदत होईल. पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.“पत्रकारांनी सत्य मांडताना घाबरू नये” - गौर गोपाल दास 'पत्रकारांचे मानसिक स्वास्थ्य' या विषयावर गौर गोपाल दास यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अलीकडे आपली नोकरी टिकवण्यासाठी पत्रकार अनेक दडपणांखाली काम करताना दिसतात. बहुतांश पत्रकारांनी समाजापुढे सत्य मांडण्यासाठी पत्रकारिता हा व्यवसाय स्वीकारलेला असतो. पत्रकारांना अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण त्यातूनही मार्ग काढत पत्रकारांनी यथाशक्ती सत्याची मांडणी करावी. त्यामुळे त्यांची घुसमट कमी होऊन त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभेल.” विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. मृणालिनी नानिवडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण हिंदुस्तान टाइम्सचे डिजिटल संपादक हारीस शेख यांनी प्रात्यक्षिकांसह पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. “एआय हा पत्रकारांसाठी मदतनीस आहे, मात्र तो पत्रकार होऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.आदर्श पत्रकारिता पुरस्कार यावेळी भारती अत्रे-सहस्त्रबुद्धे, इनपुट एडिटर, एबीपी माझा; संजय मलमे, संपादक, नवराष्ट्र; गणेश मोरे, इनपुट हेड, झी 24 तास; प्रकाश सावंत, संपादक, नवशक्ती; शिवाजी शिंदे, इनपुट एडिटर, साम टीव्ही; आणि शैलेंद्र शिर्के, संपादक, पुण्यनगरी यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक कृतज्ञता सन्मान अनुप मोरे, संस्थापक-अध्यक्ष, अनुप मोरे सोशल फाउंडेशन आणि नीलय मेहता, नीलया एज्युकेशन, पुणे यांना सामाजिक कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या पत्रकार सदस्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावेळी मांडल्या. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Video News

अन्य बातम्या

Rescue Operation l सह्याद्रीच्या खोऱ्यात अडकलेल्या दोन ट्रेकर्सची हेल्प फाउंडेशनकडून सुखरूप सुटका

खोपोली (प्रतिनिधी) : खोपोली शहरातील प्रसिद्ध झेनिथ वॉटर फॉल आणि केपी वॉटर फॉल परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या चेंबूर येथील दोन युवकांची हेल्प फाउंडेशन आणि खोपोली पोलिसांच्या समन्वयातून सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना रविवारी घडली.     आर्यन जितेश शिवलानी (वय १८) व जहान निलेश भाटिया (वय १८,) दोघेही रा. चेंबूर, हे युवक १४ जून रोजी सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ व केपी वॉटर फॉल परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. तळपते ऊन, अवघड चढ-उतार आणि प्रदीर्घ भटकंती दरम्यान त्यांच्याकडील पाणी आणि खाद्यपदार्थ संपले. दुर्दैवाने ते वाटही चुकले. सुरुवातीला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकण्याची असलेली उत्सुकता हळूहळू भीतीत बदलू लागली. काही वेळात अंधार पडणार आणि त्यानंतर काय, या विचाराने ते चिंताग्रस्त झाले.       अखेर त्यांनी आपल्या पालकांशी तसेच पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती देत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. संबंधित परिसर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या पथकाद्वारे तात्काळ मदतकार्य सुरू करत हेल्प फाउंडेशनलाही सहकार्याचे आवाहन केले.      हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सौरभ घरत, महेश भोसले, अमोल कदम, निलेश यादव, राजवर्धन मोहिते, भक्ती साठेलकर आणि धर्मा पाटील यांनी तत्काळ संबंधित युवकांशी संपर्क साधत त्यांना धीर दिला. “आम्ही मदतीसाठी येत आहोत,” असा विश्वास देत रेस्क्यू टीमने केपी वॉटर फॉलच्या दिशेने अवघड चढाई सुरू केली, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर ते त्या युवकांपर्यंत पोहोचले. त्यांना एनर्जी ड्रिंक, पाणी आणि खाद्यपदार्थ देत मानसिक आधार देण्यात आला. त्यानंतर कोणतीही शारीरिक इजा होऊ न देता दोन्ही युवकांना सुखरूपपणे खाली आणण्यात आले.       दत्त मंदिर येथे आल्यानंतर जगदीश जाखोटिया यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली तसेच संबंधित युवकांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांची मुले सुरक्षित असल्याची माहिती दिली. यानंतर खोपोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आणि संबंधित युवकांना रवाना करण्यात आले. साधारणतः काही तास रंगलेल्या या थरारक रेस्क्यू मोहिमेचा शेवट सुखरूप आणि सकारात्मक परिणामाने झाला. या मदतकार्याबद्दल युवकांच्या पालकांनी हेल्प फाउंडेशन आणि खोपोली पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.       दरम्यान, सह्याद्रीच्या कपाऱ्यात निसर्गाचा आनंद घेताना ट्रेकर्सनी अभ्यासपूर्ण नियोजन, सुरक्षित हालचाली आणि स्वतःच्या जीविताची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी यानिमित्ताने केले.

Mavalmaza android application

Coming soon..