Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढला; सोमवारी दिवसभर पाऊस - आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज

लोणावळा : मागील काही दिवसापासून विसावलेल्या पावसाचा जोर लोणावळा शहरामध्ये पुन्हा वाढला आहे. सोमवारी 20 जुलै रोजी लोणावळा शहरात दिवसभर जोरदार पाऊस झाला. मागील तीन ते चार दिवसापासून लोणावळा श�

लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढला; सोमवारी दिवसभर पाऊस - आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज

लोणावळा : मागील काही दिवसापासून विसावलेल्या पावसाचा जोर लोणावळा शहरामध्ये पुन्हा वाढला आहे. सोमवारी 20 जुलै रोजी लोणावळा शहरात दिवसभर जोरदार पाऊस झाला. मागील तीन ते चार दिवसापासून लोणावळा श�

क्राईम-न्युज

मोठी बातमी l पाटण गावावर अस्मानी संकटानंतर सुलतानी संकट! दरडीच्या भीतीने गाव खाली करताच चोरट्यांनी अनेक घरे फोडली

लोणावळा : मावळ तालुक्यातील पाटण गावाला निसर्गाच्या कोपानंतर आता मानवनिर्मित संकटाचा सामना करावा लागत आहे. ६ जुलै रोजी घडलेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण गाव खाली करण्यात आले होते. मात्र, याच आपत्तीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बुधवारी (८ जुलै) रात्री गावात अक्षरशः हैदोस घातला. एकाच रात्री १५ ते २० बंद घरांची कुलूपे आणि कड्या तोडून लाखो रुपयांचे दागदागिने व रोख रक्कम लंपास केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या दुहेरी संकटामुळे पाटण ग्रामस्थांमध्ये तीव्र भीती आणि प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.नेमके काय घडले?६ जुलै रोजी डोंगराच्या कुशीत वसलेल्या पाटण गावात दरड कोसळून एकाच घरातील ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाटण गावाला मोठा धोका निर्माण झाल्याचे पाहत प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना गाव खाली करण्याचे आदेश दिले. जीवाच्या भीतीने व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी आपली घरे बंद केली आणि ते नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले.       गाव संपूर्णपणे सुने असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. बुधवारी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत चोरट्यांनी गावात प्रवेश केला आणि एकामागून एक तब्बल १५ ते २० घरांच्या कड्या व कुलूपे तोडून घरफोड्यांचा सपाटा लावला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून चोरटे पसार झाले."आम्ही गाव खाली केले, मग प्रशासनाने सुरक्षा का केली नाही?" – ग्रामस्थांचा संतप्त सवालया घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गावात धाव घेतली. आपल्या घरांची झालेली दुरवस्था आणि चोरीला गेलेला ऐवज पाहून नागरिकांचा संयम सुटला. "प्रशासनाच्या सूचनेचा मान राखून आम्ही आमची घरे दारे सोडून बाहेर गेलो. मग आमच्या मागे गावाची आणि आमच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का? गावात किमान दोन पोलीस कर्मचारी जरी गस्तीला ठेवले असते, तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. एका बाजूला हक्काचे घर सोडून जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे साठवलेली पुंजी चोरीला गेल्याचा धक्का, आम्ही आता जगायचे कसे?" असा प्रश्न  संतप्त ग्रामस्थानी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:1)नुकसान भरपाई मिळावी : नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच हवालदिल झालेल्या नागरिकांना या चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.2) चोरांना तात्काळ अटक : पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. तसेच नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेणाऱ्या या चोरट्यांना कडक शासन करावे.3) गावात २४ तास पोलीस बंदोबस्त : जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत रिकाम्या असलेल्या पाटण गावात २४ तास पोलीस गस्त तैनात करण्यात यावी.      या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, आपत्तीच्या काळातही माणुसकी विसरणाऱ्या चोरट्यांचा आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. आता यावर मावळ तालुका प्रशासन आणि सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ

संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्था भविष्यात मोठी भरारी घेईल – दीपक फल्ले

लोणावळा : संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्था भविष्यात मोठी भरारी घेत अनेक कुशल विद्यार्थी घडवेल, असा विश्वास आर्या इंडस्ट्रीजचे संचालक दीपक फल्ले यांनी व्यक्त केला. मळवली येथील संपर्क संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थी निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.     यावेळी व्यासपीठावर संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य देवांशू चॅटर्जी, अलाईड मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे मनुष्यबळ व्यवस्थापक संजय पाटोळे तसेच संपर्क संस्थेच्या विश्वस्त रत्ना बॅनर्जी उपस्थित होते.    दीपक फल्ले म्हणाले, "प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वप्रथम आयुष्यातील ध्येय निश्चित केले पाहिजे. रचनात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने परिश्रम केल्यास जीवनात निश्चितच यश मिळते." त्यांनी विद्यार्थ्यांना जगातील यशस्वी उद्योगपती आणि खेळाडूंची पीपीटीद्वारे उदाहरणे देत स्वानुभवही सांगितले. मोठे यश मिळवायचे असेल तर आजपासूनच कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, असा संदेश त्यांनी दिला.     संजय पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण पूर्ण करून उद्योगविश्वात प्रवेश करण्याचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळण असतो. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून त्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करून मेहनतीची तयारी ठेवावी.    अमितकुमार बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी संपर्क संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थ्यांनी काळानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विंध्या बापट यांनी संपर्क औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपर्क संस्थेच्या विश्वस्त नवनिता चॅटर्जी यांनी केले.    या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य विक्रम शेगावकर, सतीश माळी, कृष्णांत सातार्डेकर, प्रभाकर खंडारे, समाधान माहोर तसेच संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड पडण्याच्या धोक्याने नागरिकांना गाव खाली करायला लावले मात्र प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था झाली नाही - नागरिकांचा आरोप

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

कारमेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोली येथे वनमहोत्सव सप्ताह उत्साहात साजरा

खोपोली (प्रतिनिधी) : कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली येथे दि. १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात  पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्थानिक व्यवस्थापिका सिस्टर  ज्युली मारिया, मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, उपमुख्याध्यापिका सिस्टर  सारूपिया  यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच वर्गशिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले.    संपूर्ण आठवडाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच वृक्षसंवर्धनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणारे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली.    वनमहोत्सव सप्ताहाचा समारोप प्रसिद्ध वृक्षप्रेमी सौ. उषा केळबाईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितले. तसेच वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर कोणती जबाबदारी स्वीकारावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव अधिक दृढ झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अधिक बळकट व्हावी हीच भावना आहे.

Mavalmaza android application

Coming soon..