Get in on
लोणावळा : लोणावळा शहरातील जनतेने ज्यांना नाकारले आहे त्यांनी फार फुशारक्या मारायची गरज नाही. आपत्कालीन परिस्थितीत राजकारण करताय, आरोप प्रत्यारोप करताय, हरकत नाही, त्यांच्या काळातील काळ्य�
लोणावळा : मागील काही दिवसापासून विसावलेल्या पावसाचा जोर लोणावळा शहरामध्ये पुन्हा वाढला आहे. सोमवारी 20 जुलै रोजी लोणावळा शहरात दिवसभर जोरदार पाऊस झाला. मागील तीन ते चार दिवसापासून लोणावळा श�
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनचालकांना लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे औंढे गावाजवळील पुलानजीक 15 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 4.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी आपल्या ताब्यातील टेम्पोने पुण्याबाजूकडून मुंबईकडे जात असताना लघुशंकेसाठी एक्सप्रेसवेच्या कडेला वाहन थांबवले. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीकडील सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून पोबारा केला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(4), 352 व 351(2) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान हा गुन्हा संदेश अंकुश हिलम (वय 23, रा. विनेगाव, बावदेववाडी, ता. खालापूर, जि. रायगड) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच 9 हजार 700 रुपये रोख रक्कम असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही उघड झाले असून त्याच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाणे, जिल्हा रायगड येथे दरोडा आणि जबरी चोरीचे दोन गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोमपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार संतोष शेळके, अंजर मोमीन, सागर नामदास, गणेश होळकर, सिद्धेश पाटील तसेच पोलीस शिपाई भारत मोहोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
लोणावळा : मावळ तालुक्यातील निगडे येथील कै. रामदास सखाराम ठाकर यांच्या कुटुंबावर 5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. पुराच्या पाण्यात वाहून जाऊन कै. रामदास ठाकर यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 7 वर्षांचा मुलगा साहिल आणि 5 वर्षांचा मुलगा मयूर असा परिवार आहे. घरातील एकमेव आधार हरपल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ठाकर कुटुंबातील दोन्ही लहान मुलांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्यात आले असून त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी देखील संघटनेमार्फत स्वीकारण्यात आली आहे. यासोबतच संघटनेचे पदाधिकारी श्री. शाम पवार यांच्या वतीने कुटुंबाला तातडीची 5000 रुपये आर्थिक मदत देखील देण्यात आली. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुशांत बालगुडे म्हणाले, "आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना मावळ तालुक्यातील कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू देणार नाही. घराचा कर्ता हरपला असला तरी समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. या दोन चिमुकल्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ठाकर कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीची मदत मिळावी, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. संकटाच्या काळात समाजाने एकत्र येऊन पूरग्रस्त कुटुंबाला आधार देण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत बालगुडे, शाम पवार, उपसरपंच गणेश भांगरे, पवन मावळ अध्यक्ष आशुतोष धामणकर, निशांत बालगुडे, अक्षय धामणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली येथे दि. १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्थानिक व्यवस्थापिका सिस्टर ज्युली मारिया, मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, उपमुख्याध्यापिका सिस्टर सारूपिया यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच वर्गशिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले. संपूर्ण आठवडाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच वृक्षसंवर्धनाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणारे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली. वनमहोत्सव सप्ताहाचा समारोप प्रसिद्ध वृक्षप्रेमी सौ. उषा केळबाईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितले. तसेच वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर कोणती जबाबदारी स्वीकारावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव अधिक दृढ झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अधिक बळकट व्हावी हीच भावना आहे.
