Get in on
लोणावळा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळा शहरांमध्ये लोणावळा नगरपरिषद व संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेसमोर �
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेने समिती गठीत करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरच�
खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी (दि. 1 जून) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची समोर असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (वय 80), मुकिंदा सस्ते (वय 56) आणि महेंद्र पाल (वय 39) यांचा समावेश आहे. अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मदतकार्यात महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन अशा विविध यंत्रणानी सहभाग घेतला.
बेडसे मावळ : मावळ तालुक्यातील बेडसे गावात काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत सर्वस्व गमावलेल्या श्रीमती शालिनीताई दहिभाते यांच्या पाठीशी संपूर्ण मावळ धावून आला आहे. सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालत, विविध सामाजिक बांधव आणि भाजप मावळ परिवाराच्या वतीने शालिनीताई यांना नवीन घर उभारणीसाठी विटा, लोखंडी अँगल, सिमेंट पत्रे यांसह मोठी आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. आज, दि. ३ जून रोजी माजी राज्यमंत्री श्री. बाळाभाऊ भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या घराच्या उभारणीचा थाटात शुभारंभ करण्यात आला.क्षणार्धात संसार खाक, कुटुंबावर आभाळ फाटलेदि. १९ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता बेडसे येथील श्रीमती शालिनीताई दहिभाते यांच्या घराला अचानक भीषण आग लागली होती. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, पाहता पाहता शालिनीताईंचे संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत त्यांचा संपूर्ण संसार, घरातील जीवनावश्यक वस्तू आणि आयुष्यभराची पुंजी क्षणार्धात नष्ट झाली. राहते घर हिरावले गेल्याने दहिभाते कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते आणि त्यांच्यासमोर पुढील जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.सोशल मीडियाचा सकारात्मक वापर; मदतीचा ओघया दुःखद घटनेची माहिती मिळताच, भाजप पुणे जिल्हा उत्तरचे संयोजक कु. विकास घारे यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी सामाजिक भावनेतून विविध व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शालिनीताई यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला भारतीय जनता पार्टी मावळ परिवार तसेच तालुक्यातील विविध स्तरांतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या काही दिवसांतच घर उभारणीसाठी लागणारे साहित्य गोळा करण्यात आले.संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता, समाजाने एकत्र येऊन गरजूंच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे राहणे गरजेचे आहे. समाजातील ही एकजूट, संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. — श्री. बाळाभाऊ भेगडे (माजी राज्यमंत्री) या मदत वाटप आणि घर कौलारू करण्याच्या शुभारंभ प्रसंगी मावळ तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अभिमन्यू शिंदे, गणेश ठाकर, शंकरभाऊ लोखंडे, विकास घारे, बबन दहिभाते, दत्ता दहिभाते, पंढरीनाथ दहिभाते, चंद्रकांत दहिभाते, विकास दहिभाते, विनोद दहिभाते, सुभाष दहिभाते, बाबाजी दहिभाते, मदन दहिभाते, विष्णु शेंडगे, तानाजी शेंडगे, संजय शेंडगे, अनिल साबळे, प्रशांत लगड या सर्व मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून दहिभाते कुटुंबाला धीर दिला. सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरणसंकटाच्या अत्यंत कठीण काळात बेडसे गावाने आणि मावळवासीयांनी दिलेला हा मदतीचा हात केवळ आर्थिक किंवा भौतिक सहाय्य नसून, समाजातील जिवंत माणुसकीचे प्रतीक आहे, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या मदतीमुळे शालिनीताईंच्या डोक्यावर पुन्हा हक्काचे छप्पर उभे राहणार असून, दहिभाते कुटुंबाने सर्व मदतकर्त्यांचे अत्यंत भावूक होऊन आभार मानले आहेत.
पुणे : पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात योग क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्याबद्दल सूक्ष्म योगा फाउंडेशनचे संस्थापक पंकज अनिल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सूक्ष्म योग फाउंडेशनच्या माध्यमातून पंकज शर्मा यांनी योग, ध्यान, प्राणायाम आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. विशेषतः त्यांनी राबविलेल्या ‘योग सेवा अभियान’ या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील विविध भागांमध्ये ९० दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित करण्यात आले. या अभियानामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत योग पोहोचला असून, हजारो नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ झाला आहे. याशिवाय शाळांमध्ये मोफत योग शिक्षण, महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम, तसेच युवकांमध्ये मानसिक सुदृढतेसाठी कार्यशाळा असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येत आहेत. पुरस्कार स्वीकारताना पंकज शर्मा म्हणाले, "हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, या ध्येयाने आम्ही काम करत आहोत. ‘योग सेवा अभियान’ सारख्या उपक्रमांद्वारे समाज अधिक निरोगी आणि सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील." या सन्मानामुळे सूक्ष्म योग फाउंडेशनच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, समाजामध्ये आरोग्य आणि जागरूकतेचा संदेश अधिक व्यापक पद्धतीने पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
खोपोली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत खोपोली शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्मितीसाठी एक सकारात्मक आणि दूरदृष्टीचा उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण, प्राणीजीवन तसेच मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी खोपोली नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता नागरिकांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मार्केट परिसरात वेंडिंग मशीनच्या माध्यमातून माफक दरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा अभिनव निर्णयही घेण्यात आला आहे. आज प्लास्टिक पिशव्यांचा बेफाम वापर ही पर्यावरणासमोरील गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिक सहज नष्ट होत नसल्याने गटारे तुंबणे, जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणे, माती व जलप्रदूषण वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सवयींमध्ये छोटासा बदल करत कापडी पिशव्यांचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमात प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांचे विशेष स्वागत करून त्यांचे कौतुकही करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी सामान्य नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करत नागरिकांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यास प्राधान्य देण्याची सकारात्मक भूमिका दर्शवली.यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक संदीप पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील, इनरव्हील क्लब ऑफ खोपोलीची संपूर्ण कार्यकारिणी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे, गुरुनाथ साठेलकर तसेच स्वच्छता निरीक्षक गौतम मोरे, शिवा चिन्नास्वामी, शहर समन्वयक भक्ती साठेलकर आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. “आज एक कापडी पिशवी स्वीकारली, तर उद्या पर्यावरणासाठी मोठे योगदान दिले”, हा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची नवी जाणीव निर्माण करणारा ठरला आहे. या उपक्रमात प्रशांत साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
