Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

लोणावळ्यात 'वाय. सी. क्लासेस' तर्फे दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न!

लोणावळा : लोणावळा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या 'वाय. सी. क्लासेस'च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुण�

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला पण पावसाचे काय? पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतातूर

लोणावळा : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी मान्सूनच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. मे महिन्याची अखेर ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मावळ तालुक्यात बहुतांश ठिकाण�

क्राईम-न्युज

Accident News l मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू; तिघे जखमी

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी (दि. 1 जून) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत.       मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची समोर असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.       या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीर तर अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (वय 80), मुकिंदा सस्ते (वय 56) आणि महेंद्र पाल (वय 39) यांचा समावेश आहे.       अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मदतकार्यात  महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन अशा विविध यंत्रणानी सहभाग घेतला.

मावळ

Karla News l कार्ला येथे मंडप व्यावसायिकाच्या गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात

लोणावळा : कार्ला परिसरामध्ये मंडप व्यावसायिकाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत चाळीस ते पन्नास लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत राजमुद्रा इव्हेंट चे मालक ज्ञानेश्वर महादु हुलावळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर हुलावळे यांनी आपला मंडप व्यवसाय उभारण्यासाठी मोठ्या मेहनतीने आणि सुमारे ४० ते ५० लाख रुपये खर्च करून महागडे साहित्य खरेदी केले होते. हे सर्व साहित्य गोदामात ठेवले होते. आज अचानक या गोदामाला आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गोदामाला आपल्या विळख्यात घेतले.नागरिकांचे प्रयत्न व अग्निशमन दलाची मदतआग लागल्याचे समजताच परिसरातील तरुण आणि नागरिकांनी तातडीने धाव घेतली. गावकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने ती आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर लोणावळा नगरपालिका, वडगाव नगरपालिका आणि आयआरबी (IRB) कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले.व्यावसायिकाचे कंबरडे मोडलेज्ञानेश्वर हुलावळे हे कारला गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गृहस्थ आहेत. मोठ्या मेहनतीने व कष्टाने त्यांनी आपला हा मंडप व्यवसाय उभा केला होता. मात्र आज या दुर्घटनेत गोदामातील सर्वच्या सर्व साहित्य जळून राख झाले आहे. एक मेहनती व्यावसायिकाचा व्यवसाय काही क्षणातच उध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना खूप मोठा कालावधी लागणार असून, या अचानक आलेल्या संकटामुळे हुलावळे यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शासनाने याची दखल घेत त्यांचा नुकसानीचा पंचनामा करत त्यांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

पिंपरी-चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात मोठी घोषणा; सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.बावनकुळे व गौर गोपाल दास यांचा विशेष सन्मान महसूल खात्यात काम करताना ऐतिहासिक व क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा, तसेच आपल्या ओघवत्या वाणीने तरुण पिढीत चैतन्य निर्माण केल्याबद्दल गौर गोपाल दास यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “माझ्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे. समाजाचा आरसा बनवून पत्रकार आम्हाला विविध कामे सुचवतात. चुका दाखवून देतात. त्यामुळे आधी प्रभावी विरोधक म्हणून आम्हाला काम करता आले आणि आता आम्ही लोकाभिमुख राज्यकारभार करून शकत आहोत. पत्रकारांचे राज्याच्या विकासामध्ये योगदान मोठे आहे.” ते पुढे म्हणाले की, पुणे-मुंबई प्रमाणे राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा दिली जाईल. पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतले आहेत तसेच भविष्यातही घेण्यात येतील.“वृत्तपत्र वाचूनच मराठी शिकत आहे” - राज्यपाल यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, “महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून काम करत असताना मी मराठी भाषा देखील शिकत आहे. मराठी वृत्तपत्रांचा मला त्यासाठी उपयोग होत आहे. यावेळी मी इंग्रजीत बोलत असलो तरी पुढच्या वेळी मी मराठीत भाषण करीन.” कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गुणवत्ता अधिक वाढण्यास मदत होईल. पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.“पत्रकारांनी सत्य मांडताना घाबरू नये” - गौर गोपाल दास 'पत्रकारांचे मानसिक स्वास्थ्य' या विषयावर गौर गोपाल दास यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अलीकडे आपली नोकरी टिकवण्यासाठी पत्रकार अनेक दडपणांखाली काम करताना दिसतात. बहुतांश पत्रकारांनी समाजापुढे सत्य मांडण्यासाठी पत्रकारिता हा व्यवसाय स्वीकारलेला असतो. पत्रकारांना अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण त्यातूनही मार्ग काढत पत्रकारांनी यथाशक्ती सत्याची मांडणी करावी. त्यामुळे त्यांची घुसमट कमी होऊन त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभेल.” विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. मृणालिनी नानिवडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण हिंदुस्तान टाइम्सचे डिजिटल संपादक हारीस शेख यांनी प्रात्यक्षिकांसह पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. “एआय हा पत्रकारांसाठी मदतनीस आहे, मात्र तो पत्रकार होऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.आदर्श पत्रकारिता पुरस्कार यावेळी भारती अत्रे-सहस्त्रबुद्धे, इनपुट एडिटर, एबीपी माझा; संजय मलमे, संपादक, नवराष्ट्र; गणेश मोरे, इनपुट हेड, झी 24 तास; प्रकाश सावंत, संपादक, नवशक्ती; शिवाजी शिंदे, इनपुट एडिटर, साम टीव्ही; आणि शैलेंद्र शिर्के, संपादक, पुण्यनगरी यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक कृतज्ञता सन्मान अनुप मोरे, संस्थापक-अध्यक्ष, अनुप मोरे सोशल फाउंडेशन आणि नीलय मेहता, नीलया एज्युकेशन, पुणे यांना सामाजिक कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या पत्रकार सदस्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावेळी मांडल्या. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Video News

अन्य बातम्या

भारत-नेपाळचे नाते होणार 'योगमय'! नेपाळचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी लामिछाने आणि कैवल्यधामचे सुबोध तिवारी यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक

लोणावळा : नेपाळचे राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे अध्यक्ष श्री. रवी लामिछाने आणि लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. सुबोध तिवारी यांची नुकतीच नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट झाली. भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे नेते रवी लामिछाने यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भेटी दरम्यान दोन्ही देशांमधील योगिक संबंध अधिक दृढ करण्यावर आणि विशेषतः नेपाळमध्ये योगप्रसाराला गती देण्यावर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.          या भेटीदरम्यान श्री. सुबोध तिवारी यांनी श्री. रवी लामिछाने यांना लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेच्या गौरवशाली कार्याची आणि संस्थेच्या शतकपूर्ती (१०० वर्षे) महोत्सवाची माहिती दिली. कैवल्यधामने गेली अनेक दशके वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पातळीवर योगाचा प्रचार-प्रसार कसा केला, यावर चर्चा झाली. रवी लामिछाने यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याशी संवाद साधण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी होता, अशा भावना तिवारी यांनी व्यक्त केल्या.       या प्रसंगी श्री. सुबोध तिवारी यांच्या हस्ते रवी लामिछाने यांना भारताचा समृद्ध योगिक वारसा आणि 'इंडियन योग असोसिएशन'चे एक ज्ञान, अनेक परंपरा (One Wisdom, Many Traditions) हे विशेष प्रकाशन सन्मानपूर्वक भेट देण्यात आले. योगाचे विविध मार्ग कसे एकाच उद्देशासाठी एकत्र येतात, याचा उत्तम पुरावा देणारे हे प्रकाशन पाहून लामिछाने अत्यंत प्रभावित झाले.*भारत-नेपाळ योग संबंध: चर्चेतील ३ महत्त्वाचे निर्णय*१. नेपाळमधील १०० शिक्षक लोणावळ्यात येणार : नेपाळमधील १०० शिक्षकांचा एक मोठा वर्ग लवकरच लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेत विशेष योग प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.२. कैवल्यधामचे तज्ज्ञ नेपाळला जाणार : आगामी काळात कैवल्यधाम संस्थेतर्फे थेट नेपाळमध्ये योग प्रशिक्षण शिबिरे आणि उपक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी कैवल्यधामचे वरिष्ठ योग तज्ज्ञ आणि मार्गदर्शक नेपाळचा दौरा करणार आहेत.३. श्री. रवी लामिछाने लोणावळ्याला भेट देणार : स्वतः नेपाळच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे अध्यक्ष श्री. रवी लामिछाने यांनी आगामी ६ महिन्यांत लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेला प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.      *योगाच्या माध्यमातून भारत आणि नेपाळचे हे 'योगमय' नाते आगामी काळात अधिक वृद्धिंगत आणि घट्ट होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली ही भेट आणि चर्चा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवशाली बाब आहे. – श्री. सुबोध तिवारी (मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी, कैवल्यधाम योग संस्था)*

Mavalmaza android application

Coming soon..