Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala Rain Information l लोणावळा शहरामध्ये बुधवारी मुसळधार पाऊस ! 24 तासात 165 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये बुधवारी 2 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला आहे. 24 तासांमध्ये 165 मिमी (6.50 इंच) पावसाची नोंद लोणावळा शहरामध्ये झाली आहे. जून महिन्यापासून लोणावळा शहरामध्ये जोरदार पाऊस सुर�

व्ही. पी. एस. प्राथमिक विद्यालयात पंढरीच्या वारीचा आगळा वेगळा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभा संस्थेच्या व्ही. पी. एस. प्राथमिक विद्यालयात इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांसाठी पंढरीच्या वारीचा आगळा वेगळा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आ�

क्राईम-न्युज

Lonavala l तुंगार्ली गावातील जाखमाता मंदिर व हनुमान मंदिरात चोरी; दानपेट्या फोडल्या

लोणावळा : तुंगार्ली गावातील ग्रामदैवत जाखमाता मंदिर व शेजारी असलेल्या हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली आहे. जाखमाता मंदिरातील दानपेटी ही जड असल्याने ती जागेवरच फोडण्यात आली असून हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेऊन शेजारी असलेल्या जाखमाता उद्यानात जाऊन फोडली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर पहाटे 02 ते 2.50 च्या सुमारास या चोरीच्या घटना घडल्या आहेत. हनुमान मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. अंगावर रेनकोट घातलेला एक चोरटा यामध्ये दानपेटी उचलून घेऊन जात असल्याचे दिसत आहे.         लोणावळा शहरांमधील चोरीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. कोणत्या ना कोणत्या भागामध्ये सातत्याने चोऱ्यांचे प्रकार सुरू आहेत. सध्या चोरट्यांनी देवस्थानच्या पेट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मागील महिना दीड महिन्यांमधील मंदिरांमधील चोऱ्यांचा हा पाचवा प्रकार आहे. तुंगार्ली ग्रामस्थांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांना माहिती दिली असून तक्रार दाखल करण्यासाठी ग्रामस्थ पोलीस ठाण्यात गेले आहेत. तसेच ग्रामस्थांकडून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरांमधील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे पोलीस देखील या घटनेचा तपास करत आहेत. तुंगार्ली गावाच्या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट मागील तीन ते चार दिवसापासून बंद आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मावळ

पवना धरण परिसरात बुधवारी जोरदार पाऊस ! 24 तासात 94 मिमी पावसाची नोंद; धरणात 66.49 टक्के पाणीसाठा

लोणावळा : संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची व मावळ तालुक्याच्या काही भागात तहान भागविणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरण परिसरात बुधवारी 2 जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. 24 तासात धरण क्षेत्रात 94 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आज पर्यंत पवना धरण क्षेत्रामध्ये 1022 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेर केवळ 315 मिमी पाऊस झाला होता व धरणात सुद्धा 18.38 टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता.    यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली आहे. संपूर्ण जून महिना मावळात पाऊस पडत राहिल्याने तालुक्यातील सर्वच धरणे जवळपास भरली आहेत. वडिवळे व कासारसाई या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मावळातील सर्व धरणे शंभर टक्के भरतील अशी स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड

Mock Drill l पुणे शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल घेण्यात आले. या सर्व ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली.       यावेळी विधान भवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, अपर आयुक्त अरुण आनंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.      श्री. डुडी म्हणाले, या मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. सुरुवातीला भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट करण्यात आला, त्यानंतर अश्रू धूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याप्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले. यानुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती. सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद दिला. आरोग्य यंत्रनेने आरोग्य सुविधा रुग्णवाहीका सेवा वेळेत उपलब्ध करुन देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. मॉक ड्रिलची सर्व प्रक्रिया 25 ते 60 मिनिटात पूर्ण करण्यात आली.        ग्रामीण भागातील लोकांमध्ये या मॉक ड्रिलद्वारे जनजागृती होण्यासाठी तेथील सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक नागरिक यांनीही यात सहभाग घेतला होता. या मॉक ड्रिलमध्ये खूप कमी वेळात प्रशासनाने तयारी करुन सर्व विभागांनी आपाआपली जबाबदारी, नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने पार पाडले.      विधानभवन प्रांगण, पुणे महानगरपालिका प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारत, वनाज औद्योगिक परिसर, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगरपरिषद या शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये संरक्षण दल, नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ, पोलीस, महसूल, आरोग्य, नगरपालिका, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थान विभाग, रेड क्रॉस सोसायटी, तसेच संबंधित शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्टीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरु युवा केंद्राचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मॉक ड्रिल दक्षता म्हणून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी सांगितले.

Video News

अन्य बातम्या

आ. शेखर निकम यांचा कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम आवाज; पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या कलम 293 अंतर्गत प्रस्तावावर सशक्त मांडणी

मुंबई/प्रतिनिधी (विलास गुरव) : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकण विभागातील विविध प्रश्न, विकासाच्या योजना, शेतकऱ्यांच्या अडचणी, आणि सामाजिक सुविधा याविषयी ठाम व अभ्यासपूर्ण भूमिका घेत स्पष्टपणे सरकारचे लक्ष वेधले. विधिमंडळाच्या कलम 293 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावात कोकणच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले.      त्यांनी सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांकडे लक्ष वेधले. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही हा महामार्ग अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. यावर्षी तरी हे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न त्यांनी सरकारपुढे उपस्थित केला. दाभोळ ते पेढे जलमार्ग क्रमांक 28, रो-रो वाहतूक सेवा, खाडी खोलीकरण, पर्यटनवाढ आणि पूरनियंत्रण यासाठी बंदरविकास तातडीने आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणातील जलमार्गाचा उपयोग वाढवून वाहतूक, उद्योग आणि पर्यटन यांना चालना मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.     शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, 30 वर्षांपूर्वी अधिग्रहित केलेली जमीन जर सरकारने वापरलीच नाही, तर ती शेतकऱ्यांना परत द्यावी किंवा त्यावर विकास करून संबंधितांना योग्य मोबदला मिळावा. सौरऊर्जेसंदर्भात कोकणातील हवामान लक्षात घेता सौर पंप योजना अनेक ठिकाणी उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे केवळ ज्यांच्याकडे विजेचे कनेक्शन आहे, त्यांनाच सौर पंप लाभावा, अशी सूचना त्यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वतंत्र सौर कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणीही त्यांनी केली. रत्नसिंधू योजना ही पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक व्यवसायांसाठी उपयुक्त ठरलेली असून, ती योजना पुन्हा सुरू करण्याची गरज त्यांनी स्पष्टपणे मांडली.      छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक कोकणात भव्य स्वरूपात उभारावे, आणि चिपळूण-आलोय परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा प्रबोधिनी उभारावी, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात ठासून मांडली. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या संदर्भात शिक्षकांच्या रिक्त जागा, विशेषतः इंग्रजी व गणिताचे शिक्षक उपलब्ध नसणे, ही गंभीर समस्या असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान धोरण लागू करावे, अशी शिफारसही त्यांनी केली. चिपळूण-कराड रेल्वेमार्गास गती मिळावी, चिपळूण शहरास वारंवार भेडसावणाऱ्या पुराचा कायमस्वरूपी उपाय म्हणून 25 कोटींच्या आराखड्यास तातडीने मंजुरी द्यावी, तसेच लहान धरणे आणि जलसंधारणावर अधिक भर दिला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.      आ. शेखर निकम यांच्या या सखोल आणि अभ्यासू मांडणीमुळे कोकणच्या प्रश्नांना अधिक बळ मिळाले असून, त्याच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Mavalmaza android application

Coming soon..