Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala - नशामुक्ती मॅरेथॉन : हम तो भागेंगे मगर नशा को भी भगायेंगे - सुनिल शेट्टी

लोणावळा : "हम तो भागेंगे मगर नशा को भी भगायेंगे" असा संकल्प करा असे सांगत प्रसिद्ध अभिनेते सुनिल शेट्टी यांनी पुणे ग्रामीण पोलीस आयोजित नशामुक्ती मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविला. पाच किमी अंतर

Lonavala Breaking News : लोणावळ्यात वार्‍यामुळे दोन ठिकाणी झाडे पडली; तीन चारचाकी वाहनांचे नुकसान

लोणावळा : लोणावळा शहरात आज दुपारी अचानक काळे ढग दाटून येऊन झालेला पाऊस व त्यापूर्वी आलेला सोसाट्याचा वारा यामुळे लोणावळा बस स्थानक व यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल या ठिकाणी चंद्रिकेची झा

क्राईम न्युज

Lonavala News : लोणावळा ग्रामीण पोलिसांचा गावठी हातभट्टीवर छापा; 1 लाख 20 हजारांचा माल केला नष्ट

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहरगाव येथील कंजारभट वस्ती जवळील एका बेकायदेशीर गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकून दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचे रसायन नष्ट केले.     लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेहेरगावच्या हददीत देवकरवस्ती, कंजारभट वस्ती येथील माळरानात ओढयाचे कडेला प्राथनाबेन मेघनाथ राजपुत (वय 34, रा. वेहेरगाव, कंजारभट वस्ती, ता. मावळ) हिच्या मार्फत बेकायदेशीर रित्या गावठी दारू बनविणारी हातभट्टी चालवली जात होती. पोलिसांना याची खबर लागताच पोलीस उपअधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पो.हवा. बोकड, गाले, पो.ना. होळकर, पवार, पो.कॉ. तळपे, खैरे, कामथणकर, पंडित, होमगार्ड शिर्के यांच्या दलाने घटनास्थळी छापा टाकला.      घटनास्थळी पोलिसांना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 200 लिटर मापाच्या 12 प्लॅस्टीक ड्रममध्ये 1,20,000 रुपये किमतीचे 2400 लिटर कच्चे रसायन आढळून आले. सदरचे सर्व रसायन पोलिसांनी नष्ट केलं. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केतन तळपे यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. ना. पवार हे करीत आहे.

मावळ

Maval News : मावळात जिल्हास्तरीय विषय शिक्षक या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

तळेगाव दाभाडे : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे आणि डी वाय पाटील युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विषय शिक्षक दोन दिवसाची कार्यशाळा दि. 5 व 6 जून रोजी होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी दिली. यामध्ये प्रथम सत्र उद्घाटन शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे जिल्हा परिषद सुनंदा वाखारे (ठुबे) यांच्या अध्यक्षतेखाली व वाईस चान्सलर ( डी वाय पाटील युनिव्हर्सिटी डॉ. सायली गणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई सचिव शांताराम पोखरकर, मा. अध्यक्ष अरुण थोरात, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ मा. अध्यक्ष शिवाजीराव किलकिले, मा. अध्यक्ष हनुमंत कुंबडे मा. सचिव आदिनाथ थोरात, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ विश्वस्त बी.एम.भसे आदी उपस्थित रहाणार आहेत. तर मा. उपशिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी हे सेवा जेष्ठता व मूल्यांकन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ प्रवक्ते महेंद्र गणपुले हे नवीन शैक्षणिक धोरण व प्रश्नपत्रिका आराखडा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.दुस-या दिवशी 6 जून रोजी सकाळी एकविरा देवी गड ट्रेक, दर्शन व कार्ला लेणी सहल, सर्व विषयांची प्रश्नपत्रिका आराखडा व तज्ञ मार्गदर्शन व गटचर्चा होणार. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद निलेश धानापुणे, प्रणिता कुमावत (नाईक), सचिन लोखंडे, मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ सदस्य कुंडलिक मेमाणे, चंद्रकांत मोहोळ, हरिश्चंद्र गायकवाड उपस्थित रहाणार आहेत.. या कार्यक्रमा करीता डाॅ. विजय पाटील अध्यक्ष आणि कुलपती डी वाय पाटील युनिवर्सिटी हे मार्गदर्शन करणार आहेत.    या कार्यशाळेचे नियोजन प्रसाद गायकवाड, मधुकर नाईक, नंदकुमार सागर, भानुदास रिठे, ताबाजी वागदरे, विकास तारे, विठ्ठल माळशिकारे, प्रा.चेतन मोरे, मुख्य संयोजक राजेश गायकवाड व मावळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांनी केले आहे. 

पिंपरी चिंचवड

जागतिक पर्यावरण दिन विशेष - प्रदुषण रोखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज - डाॅ. निलेश काळे

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर, पृथ्वीवरील मानवी सजीव प्राण्यांचे जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणीय असंतुलनामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्थव्यस्थ झालेले आहेत. हीच समस्या ओळखून जगभर जनजागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून ह्या दिवशी पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.          5 जून 1974 रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला,  याचा प्रमुख उद्देश की पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाचा आणि तेथील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागला पाहिजे. मानवी जीवनशैली आधुनिकता यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. नैसर्गिक संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मानवाच्या अमर्याद गरजा या नैसर्गिक साधनसंपदावर अवलंबून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक  संसाधनावर भार पडत आहे किंवा संसाधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक यामध्ये लोकसंख्या वाढ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जगभरात या लोकसंख्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक घटकावर मोठा ताण निर्माण झाला आहे. सर्वप्रथम पर्यावरण दिनी शाळा आणि कार्यालय कामगार आणि विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी किंवा स्थानिक परिसर स्वच्छता करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे प्लास्टिक वर बंदी घालणे, पाण्याची बचत, पुनर्वापर, वन्यजीव व प्राणी वाचवणे, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण केले पाहिजे तरच मानव जात सृष्टी टिकून राहील.      जंगलाचे रक्षण केले तरच प्राणवायू भेटेल. जंगले तयार होण्यास हजारो वर्षाचा काळ लागतो तर तोडायला काही दिवस पुरतात हे आम्ही विसरत चाललो आहे. वृक्ष कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात तर ऑक्सिजन पुरवतात जागतिक तापमान वाढीपासून आपल्याला वृक्षच वाचवतात. झाडे ऊन वारा पाऊस सहन करतात आणि दुसऱ्यांना सावली देतात, लाकूड, फळे, फुले, बिया, साल, औषधी द्रव्य वृक्ष देतात. अनेक पक्षी, सजीव प्राणी, झाडांमुळे जगतात, मानवाला आता स्वतःच्या सवयी बदलण्याची गरज आहे. कागदांपेक्षा ई-मेल, इंटरनेटचा वापर करणे गरजेचे आहे किंवा ऑनलाईन चा वापर जास्त वाढविणे गरजेचे आहे. कमी ऊर्जेचे दिवे वापरून, कागदी वस्तू फेकण्याच्या ऐवजी चिनीमातीच्या वस्तू वापरणे आवश्यक आहे. पेपर नॅपकिन हा आज मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे त्याचे वापराचे प्रमाण कमी करता येऊ शकते, त्या ऐवजी सुती रुमाल टॉवेल वापरता येईल. पाण्याचा जपून वापर करणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे तसेच हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण म्हणजेच प्रदूषण होणार नाही याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष देणे आवश्यक आहे असे केले तरच पर्यावरणीय रक्षण होईल तरच मानवासमोरील पर्यावरणीय समस्या दूर होतील.डॉ. निलेश काळे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी, पुणे.मोबाईल नंबर 73 50 42 55 70(वरील लेखाचे लेखक हे प्राध्यापक आहेत)

Video News

अन्य बातम्या

खोपोलीत प्रथमच पाळीव मांजराची नोंदणी आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

खोपोली (प्रतिनिधी) : भारतातील सर्वात मोठी पाळीव मांजराची संघटना "फेलाईन क्लब ऑफ इंडिया", लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि श्री कृपा ॲक्वेरियम यांच्या माध्यमातून डॉ. रामहरी धोटे सभागृहात खोपोली शहरातील पाळीव मांजरांची नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मांजरांच्या शरीरात 16 अंकी मायक्रोचीप बसवली गेली त्याच सोबत मांजरांची जात आणि मालकीचे प्रमाणपत्रही दिले गेले. मांजरांना अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन देऊन तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली गेली आणि मांजरांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि औषधे देखील भेट दाखल दिली गेली.      फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठाण, झेड कॅनिंन डॉग ट्रेनिंग अकॅडमी नाशिकचे अध्यक्ष विक्रांत देशमुख, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा मोदी, श्री कृपा ॲक्वेरियम खोपोलीचे संचालक प्रवीण शेंद्रे, प्रयोग केनलचे संचलक प्रवीण व्यास, Drools पेट फूडच्या उर्मिला पाटील आणि जितेंद्र शहा, श्री कृपा ॲक्वेरियम माणगावच्या संचालिका संध्या कुलकर्णी, ग्रेन झिरो पेट फुडचे संदेश जाधव, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर आणि नवीन मोरे अश्या लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबिरात सहभाग घेतला.      पाळीव मांजरांच्या नोंदणी शिबिराच्या सकाळच्या सत्रात नोंदणीसह तपासण्या, औषधोपचार, सल्ला आणि प्रमाणपत्राचे वितरण केले गेले तर संध्याकाळच्या सत्रात झेड कॅनन डॉग ट्रेनिंग अकॅडमी नाशिकचे विक्रांत देशमुख आणि फेलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकीब पठाण यांनी मांजराच्या मालकांना मार्गदर्शन आणि महत्वाच्या टिप्स दिल्या.        या शिबिरात शंभरहून अधिक पाळीव मांजरांच्या मालकांनी आणि अनेक प्राणी मित्रांनी या शिबिराचा लाभ घेतला. खोपोली सारख्या या शहरात इतर शहरांच्या तुलनेत मिळालेला उत्स्फूर्त सहभाग समाधानकारक होता असे साकिब पठाण यांनी आपले मत व्यक्त केले. धकाधकीच्या जीवनात प्राणी मात्रांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अशा स्वरूपाच्या शिबिरांचे आयोजन वेळोवेळी केले जाईल असेही खोपोलीकरांना त्यांनी अभिवचन दिले.

Mavalmaza android application

Coming soon..