लोणावळा : लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विनोद होगले यांची नियुक्ती करण्यात आली. मावळचे आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे
लोणावळा : लोणावळा शहरातील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणार्या सरजु भवानी क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या नमो स्पोर्टस संघाने विनोद राघवन क्रिकेट अँकेडमी (मंडल) संघाचा 37 धावांनी पराभव करत वि
खेड : खेड तालुक्यातील गुंजाळवाडी गावाच्या हद्दीत चासकमान या धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी 4 जणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. हे चारही विद्यार्थी गुंजाळवाडी गावातील तिवळी हिल येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल मधील आहेत. निवासी असलेल्या या विद्यार्थ्यांना उद्यापासून सुट्टी लागणार होती. त्यामुळे या शाळेतील 34 विद्यार्थी शिक्षकांसह पोहण्याचा सराव करण्यासाठी चासकमान धरणाच्या जलाशयात गेले होते. त्यावेळी ही दुदैवी घटना घडली. कमरे ऐवढ्या पाण्यात हे विद्यार्थी पोहण्याचा सराव करत असताना एक मोठी लाट आली त्यामध्ये सहा ते सात विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. त्यापैकी काहींना शिक्षकांनी वाचविले मात्र चार जण लाटेच्या वेगामुळे खोल पाण्यात बुडाले असल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले.तनिषा देसाई, रितिन डीडी, परिक्षित अग्रवाल, नव्या भोसले अशी या बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची नावे आहेत. घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धरणाकडे धाव घेतली. पाण्यात उतरत विद्यार्थांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत, या घटनेचा तपास सुरु केला आहे. दरम्यान डोंगरावर बंदिस्त असलेल्या शाळेतील हे विद्यार्थी खाली आले कसे, पोहण्याचा सराव करण्यासाठी जाताना काय खबरदारी घेतली होती का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असले तरी निष्पाप विद्यार्थ्यांचे गेलेले जीव ही सर्वांच्या मनाला चटका लावून गेलेली घटना आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यात अशा दोन घटना घडल्या चासकमान येथे चारवतर भाटघर धरणात पाच महिलांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तळेगाव दाभाडे : कै. सतीश काका खळदे प्रतिष्ठानच्या वतीने वक्ता म्हणजे जगज्जेता या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी बोलताना मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले खळदे कुटुंबांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. कै. सतीश खळदे यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजासाठी संकेत काम करत आहे. उद्योजक सुधाकर शेळके म्हणाले, भाषण कसे करावे ही कार्यशाळा मोफत चालू केली याचा सर्वांनी लाभ घ्यावा. रंजनाताई भोसले यांनी सतीश काकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुणे मुंबई या ठिकाणी वक्तृत्व कलेसाठी लोक पैसे भरून कला आत्मसात करतात. असा कार्यक्रम सतीश काका खळदे प्रतिष्ठानने व कुटुंबाने मोफत राबवला असून समाजासाठी ही चांगली गोष्ट आहे. बोलेल त्याची माती विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचे सोने ही विकले जात नाही. यासाठी आपले विचार लोकांसमोर प्रकट करता आले पाहिजे असे मान्यवरांनी सांगितले. याप्रसंगी भूषण खळदे, राजेश करंडे, हर्षद पवार, महेश कदम, योगेश चौधरी, चिराग खळदे, सौरभ खळदे, ओमकर खळदे, महेश खळदे, संदीप खळदे, मुन्ना मोरे, अभय देवकर, पार्थ बवले, अजय बवले, सागर दिघे, अतुल देशपांडे, केदार शिळीमकर, वैशाली खळदे, संगीता खळदे, शैलजा खळदे, पूनम खळदे, स्वाती खळदे, पूजा खळदे, मेघा खळदे, अश्विनी खळदे, प्रशांत गायकवाड, मंदार करंडे, नितिन खळदे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर(जितू) खळदे यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले. नितीन फाकटकर यांचे व्याख्यान झाले व आभार संकेत खळदे यांनी मानले.
मुंबई : मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाने मध्यप्रदेश सरकारला मोठा दिलासा मिळाला असून ओबीसी समाजाला देखील न्याय मिळाला आहे. मध्यप्रदेशाच्या या निकालाने महाराष्ट्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र त्यासाठी मध्यप्रदेश सरकारने व व त्याच्या समर्पित आयोगाने ज्या पद्घतीने मेहनत घेतली तशी मेहनत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला व समर्पित आयोगाला घ्यावी लागणार आहे. मध्यप्रदेश सरकारने इम्पिरिकल डाटा कसा गोळा केला याचा अभ्यास करावा लागणार आहे. महाराष्ट्रात पुढील चार महिने पावसाचे असल्यामुळे निवडणुका होणे शक्य नसल्याने या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने ओबीसीचा इम्पिरिकल डाटा गोळा करत मा. सर्वोच्च न्यायलयात सादर केल्यास महाराष्ट्रात देखील ओबीसीना न्याय मिळू शकतो. मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी देताना हे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत बसण्याऐवजी युद्ध पातळीवर ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करावा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे तर छगन भुजबळ म्हणाले मध्यप्रदेशात आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राची आशा पल्लवित झाली आहे. हा निर्णय देशातील ओबीसींना न्याय देणारा आहे. बांठिया आयोग इम्पिरिकल डाटा देईल व त्या आधारे आपल्याकडेही आरक्षण पुर्ववत होईल असा विश्वास आहे.
मुंबई : राज्याच्या पोलिस दलामध्ये लवकरच 7000 पोलिस शिपायांची भरती होणार आहे. जून महिन्यापासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती गृह विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली. राज्यमंत्री मंडळाने या भरतीला पूर्वीच मान्यता दिली आहे मात्र कोरोनामुळे ही भरती होऊ शकली नव्हती. या भरतीसाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल एकाच वेळी भरती केली जाणार असून भरती प्रक्रियेमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. एक ते दीड महिन्याचा कालावधी मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पोलीस भरतीचा हा दुसरा टप्पा असेल पहिल्या टप्प्यामध्ये 5000 पोलिसांची भरती करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी दहा हजार पदे भरण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. यामुळे तरुणांना पोलीस खात्यामध्ये नोकरीची नामी संधी मिळणार आहे.