Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

लोणावळा नगरपरिषदेच्या अतिक्रमण कारवाईविरोधात पथविक्रेत्यांचा 16 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेवर धडक मोर्चा

लोणावळा : लोणावळा आणि खंडाळा परिसरातील टपरी, पथारी आणि हातगाडी धारकांवर लोणावळा नगरपरिषदेकडून अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली होत असलेल्या कथित अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ बुधवार, दि

क्राईम-न्युज

Lonavala News l बोरजमध्ये गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा; २ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट

लोणावळा : बोरज (ता. मावळ) गावच्या हद्दीतील गायरान परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २ हजार लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन पोलिसांच्या हाती लागले. हे रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले आहे.        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी बोरज गावच्या हद्दीतील गायरानात दाट झाडाझुडपांचा फायदा घेत काही इसम अवैध गावठी हातभट्टी चालवत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने पथक तयार केले आणि संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी गायरान परिसरात लपवून ठेवलेले सुमारे २,००० लिटर कच्चे रसायन आढळून आले.        या कारवाईमुळे बोरज परिसरातील अवैध हातभट्टी व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक भूषण माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे तसेच पोलीस अंमलदार जय पवार, नितीन कदम, संतोष वाडेकर, अक्षय देवकते, यश देसाई आणि ऋषीकेश अभंग यांच्या पथकाने केली. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.        दरम्यान, मावळ परिसरात अवैध गावठी हातभट्टीसह बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या गैरकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मावळ

केंद्र शासनाच्या सहसचिवांची घेरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट; विद्यार्थ्यांशी साधला मराठी, हिंदी व इंग्रजीतून संवाद

मावळ | प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयाचे मा. सहसचिव श्री. राजेश कुमार सिंग हे दि. १३ ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांच्या अनुषंगाने महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनासह सार्वजनिक तक्रार निवारण व पंचायत धरोहर उपक्रम (Redressal of Public Grievances and Panchayat Dharohar Initiative) तसेच केंद्र शासनाच्या ‘मेरी धरोहर’ उपक्रमांतर्गत कोकण व पुणे विभागातील निवडक शाळा व ग्रामपंचायतींना ते भेट देत आहेत. या दौऱ्यादरम्यान श्री. राजेश कुमार सिंग यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घेरेवाडी येथे अचानक भेट देऊन शाळेतील शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. शाळेत आगमन होताच विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.      सहसचिवांनी शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता यांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून सहसचिवांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना श्री. राजेश कुमार सिंग यांनी अत्यंत आनंदाने, उत्स्फूर्तपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात उत्तरे दिली. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सहसचिवांनी शाळेतील शिक्षक प्रियदर्शन भालेराव आणि मुख्याध्यापक डॉ. बाबासाहेब काळे यांच्याशी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत चर्चा केली. “संपूर्ण तालुक्यामध्ये अशाच प्रकारच्या गुणवत्तावान व आदर्श शाळा आहेत का?” अशी विचारणा त्यांनी केली.      त्यावर मुख्याध्यापक डॉ. बाबासाहेब काळे यांनी सांगितले की, “मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा शिक्षणाप्रती व शिक्षकांप्रती असलेला उदात्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना प्रेरणा मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी याच भावनेतून संपूर्ण जिल्ह्यात सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.” शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विविध भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता, शैक्षणिक वातावरण आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केल्यानंतर मा. सहसचिव श्री. राजेश कुमार सिंग यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.       यानंतर नियोजित पाहणीच्या अनुषंगाने श्री. राजेश कुमार सिंग हे लोहगड किल्ला, भाजे-पाटण येथील ऐतिहासिक लेणी तसेच ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यावेळी मावळचे गटविकास अधिकारी श्री. सेवक थोरात, पंचायत समिती सदस्य योगेश लोहर, सरपंच सोनाली बैकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश धानीवले, माजी सरपंच नागेश मरगळे, सदस्य पंढरीनाथ विखार, गणेश शेंडे तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

खोपोली (प्रतिनिधी) : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्यानजीक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या प्रोपलीन गॅस टँकरच्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला होता. अपघातानंतर झालेल्या गॅसगळतीमुळे महामार्गावरील हजारो वाहने, प्रवासी तसेच आजूबाजूच्या परिसराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य धोका अत्यंत मोठा असतानाही विविध यंत्रणांनी परिस्थिती संयमाने, कौशल्याने आणि अत्यंत काळजीपूर्वक हाताळल्याने मोठे संकट टळले होते.       या थरारक प्रसंगाची स्मृती आणि त्यातून मिळालेला सुरक्षिततेचा संदेश गणेशोत्सवाच्या देखाव्यातून जनतेसमोर आणण्याचा अनोखा प्रयत्न HELP Foundation चे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी केला आहे. आपल्या घरच्या गणपतीसाठी त्यांनी त्यांच्या पत्नी रश्मी यांचा समवेत कुटुंबीयांच्या सहकार्याने आडोशी बोगद्यानजीक घडलेल्या प्रोपोलिन गॅस टँकर अपघाताचा प्रतिकात्मक देखावा साकारला असून, या उपक्रमाची परिसरात चर्चा सुरू आहे.       या दुर्घटनेच्या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धनंजय गीध यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. गॅस गळतीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक परिस्थितीत तांत्रिक ज्ञान, प्रसंगावधान आणि समन्वय यांचे महत्त्व या घटनेत प्रकर्षाने अधोरेखित झाले. या देखाव्यामागील भावना स्पष्ट करताना, त्या प्रसंगी सर्व यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमागे श्री गणेशाचा आशीर्वादच असावा, अशी श्रद्धा धनंजय गीध यांनी व्यक्त केली. संकटातून सुखरूप बाहेर पडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच, महामार्गावरील सुरक्षा आणि शिस्तीबाबत जनजागृती करण्याचा उद्देशही या उपक्रमामागे आहे.     देखाव्यामध्ये आडोशी बोगद्याजवळील अपघाताचे चित्रण करण्याबरोबरच महामार्गावरील सुरक्षितता, वाहतूक शिस्त, आपत्कालीन परिस्थितीतील खबरदारी आणि HELP Foundation च्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली आहे. संकटसमयी विविध यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य कसे केले जाते, याचाही संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. खालापूर तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार अभय चव्हाण हे या देखाव्याला भेट देणार आहेत. तसेच रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह या देखाव्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे.    गणेशोत्सवातील हा देखावा केवळ एका भीषण अपघाताची आठवण करून देणारा नसून, सुरक्षा, शिस्त, तांत्रिक सज्जता, प्रशासकीय समन्वय आणि माणुसकी यांचे महत्त्व अधोरेखित करणारा जनजागृतीपर उपक्रम ठरत आहे.

Mavalmaza android application

Coming soon..