Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

Lonavala Traffic News l लोणावळा शहरात उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा वीकेंड हाउसफुल; मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

लोणावळा : शालेय उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा वीकेंड लोणावळा शहरात हाउसफुल झाला आहे. रविवारी 14 जून रोजी शाळांच्या सुट्ट्या संपणार असून 15 जून पासून राज्यभरातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू

PI Sachin Patil l लोणावळा शहर पोलीस निरीक्षकपदी सचिन पाटील रुजू; वाहतूक कोंडी आणि अमली पदार्थांच्या विरोधात कडक पावले उचलणार

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली असून, त्य�

क्राईम-न्युज

Maval News l मावळात वाढत्या अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरुद्ध मनसे आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

लोणावळा : मावळ तालुक्यात गेल्या काही काळापासून ड्रग्स, एम.डी. पावडर, गांजा आणि गुटख्यासारख्या अंमली पदार्थांची विक्री तसेच गावठी दारूचे धंदे खुलेआम सुरू आहेत. या वाढत्या अवैध धंद्यांवर तात्काळ कडक कारवाई करून ते पूर्णपणे बंद करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलिस प्रशासन आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या अनधिकृत धंद्यांवर वेळीच लगाम न घातल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांनी दिला आहे.अवैध व्यवसायांमुळे जनजीवन विस्कळीतमावळ तालुक्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यापारामुळे तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चालली आहे. या गंभीर प्रकारांसोबतच जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वेश्या व्यवसायही सुरू आहेत. या परिसरातील अवैध कृत्यांमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.प्रशासनाला इशारामनसेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांची भेट घेऊन या सर्व अवैध धंद्यांची सविस्तर माहिती दिली. हे व्यवसाय त्वरित बंद न केल्यास प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पवित्राचा सामना करावा लागेल, असे बजावण्यात आले आहे. प्रशासनाने यावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.        निवेदन देताना मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे, सचिन भांडवलकर, मोजेस दास, निरंजन चव्हाण, सुनिल सावळे, अनिल लालगुडे, विशाल लोंढे, संतोष खराडे, निखिल भोसले, अमित भोसले, राहुल मांजरेकर, दिपक सोनावणे, आकाश पारखी, जॉर्ज दास, रजनी गायकवाड, अभिजीत फासगे, दिनेश कालेकर, राजू भंडारी, निर्मल आंबेकर, नाथा पिंपळे, डॉमनिक दास, आकाश सावंत, जुबेर मुल्ला, ज्ञानेश्वर वाळुंजकर आणि गणेश घोलप यांसह अनेक महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मावळ

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

तळेगाव दाभाडे : सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.      कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे, संस्थेचे अध्यक्ष सुनील भेगडे, सचिव दत्तात्रय नाटक,  संचालक अरुण भेगडे, शालेय समिती अध्यक्ष रामराव जगदाळे, संचालक विलास भेगडे तसेच उद्योजक अतिश अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.       यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिशा जामदार हिने 93.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्रणिशा (93.20%) हिने द्वितीय, सार्थक बागुल (91.80%) याने तृतीय, ऋतुजा सोनार (91.20%) हिने चतुर्थ तर संदीप रात्रे (90.80%) याने पाचवा क्रमांक मिळविला.विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात दिशा जामदार (92 गुण), हिंदी विषयात दिशा जामदार (91 गुण), मराठी विषयात साक्षी पाटील (95 गुण), गणित विषयात सार्थक बागुल (99 गुण), विज्ञान विषयात संदीप रात्रे (98 गुण) आणि सामाजिक शास्त्र विषयात सार्थक बागुल (97 गुण) यांनी विशेष प्रावीण्य मिळविले.       यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.       कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमास पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्याध्यापिका रंजीता थंपी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर्षीच्या दहावीच्या मुलांना मार्गदर्शनही केले.

पिंपरी-चिंचवड

मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात मोठी घोषणा; सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.बावनकुळे व गौर गोपाल दास यांचा विशेष सन्मान महसूल खात्यात काम करताना ऐतिहासिक व क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा, तसेच आपल्या ओघवत्या वाणीने तरुण पिढीत चैतन्य निर्माण केल्याबद्दल गौर गोपाल दास यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “माझ्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे. समाजाचा आरसा बनवून पत्रकार आम्हाला विविध कामे सुचवतात. चुका दाखवून देतात. त्यामुळे आधी प्रभावी विरोधक म्हणून आम्हाला काम करता आले आणि आता आम्ही लोकाभिमुख राज्यकारभार करून शकत आहोत. पत्रकारांचे राज्याच्या विकासामध्ये योगदान मोठे आहे.” ते पुढे म्हणाले की, पुणे-मुंबई प्रमाणे राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा दिली जाईल. पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतले आहेत तसेच भविष्यातही घेण्यात येतील.“वृत्तपत्र वाचूनच मराठी शिकत आहे” - राज्यपाल यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, “महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून काम करत असताना मी मराठी भाषा देखील शिकत आहे. मराठी वृत्तपत्रांचा मला त्यासाठी उपयोग होत आहे. यावेळी मी इंग्रजीत बोलत असलो तरी पुढच्या वेळी मी मराठीत भाषण करीन.” कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गुणवत्ता अधिक वाढण्यास मदत होईल. पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.“पत्रकारांनी सत्य मांडताना घाबरू नये” - गौर गोपाल दास 'पत्रकारांचे मानसिक स्वास्थ्य' या विषयावर गौर गोपाल दास यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अलीकडे आपली नोकरी टिकवण्यासाठी पत्रकार अनेक दडपणांखाली काम करताना दिसतात. बहुतांश पत्रकारांनी समाजापुढे सत्य मांडण्यासाठी पत्रकारिता हा व्यवसाय स्वीकारलेला असतो. पत्रकारांना अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण त्यातूनही मार्ग काढत पत्रकारांनी यथाशक्ती सत्याची मांडणी करावी. त्यामुळे त्यांची घुसमट कमी होऊन त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभेल.” विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. मृणालिनी नानिवडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण हिंदुस्तान टाइम्सचे डिजिटल संपादक हारीस शेख यांनी प्रात्यक्षिकांसह पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. “एआय हा पत्रकारांसाठी मदतनीस आहे, मात्र तो पत्रकार होऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.आदर्श पत्रकारिता पुरस्कार यावेळी भारती अत्रे-सहस्त्रबुद्धे, इनपुट एडिटर, एबीपी माझा; संजय मलमे, संपादक, नवराष्ट्र; गणेश मोरे, इनपुट हेड, झी 24 तास; प्रकाश सावंत, संपादक, नवशक्ती; शिवाजी शिंदे, इनपुट एडिटर, साम टीव्ही; आणि शैलेंद्र शिर्के, संपादक, पुण्यनगरी यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक कृतज्ञता सन्मान अनुप मोरे, संस्थापक-अध्यक्ष, अनुप मोरे सोशल फाउंडेशन आणि नीलय मेहता, नीलया एज्युकेशन, पुणे यांना सामाजिक कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या पत्रकार सदस्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावेळी मांडल्या. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Video News

अन्य बातम्या

भारत-नेपाळचे नाते होणार 'योगमय'! नेपाळचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी लामिछाने आणि कैवल्यधामचे सुबोध तिवारी यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक

लोणावळा : नेपाळचे राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे अध्यक्ष श्री. रवी लामिछाने आणि लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. सुबोध तिवारी यांची नुकतीच नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट झाली. भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे नेते रवी लामिछाने यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या भेटी दरम्यान दोन्ही देशांमधील योगिक संबंध अधिक दृढ करण्यावर आणि विशेषतः नेपाळमध्ये योगप्रसाराला गती देण्यावर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.          या भेटीदरम्यान श्री. सुबोध तिवारी यांनी श्री. रवी लामिछाने यांना लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेच्या गौरवशाली कार्याची आणि संस्थेच्या शतकपूर्ती (१०० वर्षे) महोत्सवाची माहिती दिली. कैवल्यधामने गेली अनेक दशके वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पातळीवर योगाचा प्रचार-प्रसार कसा केला, यावर चर्चा झाली. रवी लामिछाने यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याशी संवाद साधण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी होता, अशा भावना तिवारी यांनी व्यक्त केल्या.       या प्रसंगी श्री. सुबोध तिवारी यांच्या हस्ते रवी लामिछाने यांना भारताचा समृद्ध योगिक वारसा आणि 'इंडियन योग असोसिएशन'चे एक ज्ञान, अनेक परंपरा (One Wisdom, Many Traditions) हे विशेष प्रकाशन सन्मानपूर्वक भेट देण्यात आले. योगाचे विविध मार्ग कसे एकाच उद्देशासाठी एकत्र येतात, याचा उत्तम पुरावा देणारे हे प्रकाशन पाहून लामिछाने अत्यंत प्रभावित झाले.*भारत-नेपाळ योग संबंध: चर्चेतील ३ महत्त्वाचे निर्णय*१. नेपाळमधील १०० शिक्षक लोणावळ्यात येणार : नेपाळमधील १०० शिक्षकांचा एक मोठा वर्ग लवकरच लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेत विशेष योग प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.२. कैवल्यधामचे तज्ज्ञ नेपाळला जाणार : आगामी काळात कैवल्यधाम संस्थेतर्फे थेट नेपाळमध्ये योग प्रशिक्षण शिबिरे आणि उपक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी कैवल्यधामचे वरिष्ठ योग तज्ज्ञ आणि मार्गदर्शक नेपाळचा दौरा करणार आहेत.३. श्री. रवी लामिछाने लोणावळ्याला भेट देणार : स्वतः नेपाळच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाचे अध्यक्ष श्री. रवी लामिछाने यांनी आगामी ६ महिन्यांत लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेला प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.      *योगाच्या माध्यमातून भारत आणि नेपाळचे हे 'योगमय' नाते आगामी काळात अधिक वृद्धिंगत आणि घट्ट होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली ही भेट आणि चर्चा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवशाली बाब आहे. – श्री. सुबोध तिवारी (मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी, कैवल्यधाम योग संस्था)*

Mavalmaza android application

Coming soon..