लोणावळा : जगभरात आरोग्याचा संदेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, लोणावळा येथील जगप्रसिद्ध 'कैवल्यधाम योग संस्था' आणि आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने २�
लोणावळा : लोणावळा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ९३ हजार ९०० रुपये किमतीचे 'एमडी' (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ जप्त केले असून, एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास मॅकडोनाल्डस खालील वाहन पार्किंग परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार गणेश होळकर यांनी या ठिकाणी धाव घेतली. यावेळी रोहन शंकर साठे (वय २२, सध्या रा. गुरव वस्ती, कुसगाव, ता. मावळ; मूळ रा. आपटी गेव्हंडे, ता. मावळ) या तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत अंमली पदार्थ आढळून आला.अंमली पदार्थांचा साठा जप्तपोलिसांनी रोहन साठे यांच्याकडे असलेल्या पदार्थाची तपासणी केली असता, त्यात १९ ग्रॅम ३९ मिलीग्रॅम वजनाचे 'एमडी' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारपेठेत किंमत १ लाख ९३ हजार ९०० रुपये इतकी आहे. रोहन साठे याच्यावर अंमली पदार्थ विक्रीचा उद्देश आणि बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कलम ८(क), २२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक (मपोसई) गव्हाणे करत आहेत. या कारवाईमुळे मावळ परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, लोणावळा शहरांमध्ये एमडी पावडर, गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री होत आहे. यावर कडक कारवाई करत तरुणाईला या अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढणे यासाठी पोलीस प्रशासन सातत्यपूर्ण कारवाया करणार आहे. अमली पदार्थ तस्करांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
लोणावळा : लोणावळा शहरालगत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत वाकसई व फिटनेस क्लब वाकसई यांच्या वतीने रविवारी 21 जून रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.०० वाजता ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या वयोगटांमध्ये सुरू होणार आहे. १) वयोगट १० ते १३ वर्ष - अंतर 2.5 किलोमीटर वाकसई फाटा ते करंडोली रिटर्न २) वयोगट 14 ते 16 वर्ष - अंतर पाच किलोमीटर धावणे ३) वयोगट 17 ते पुढे खुलागट - अंतर वाकसई फाटा ते जेवरेवाडी रिटर्न वरील तीन गटांमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सर्व वयोगटातील मुले व पुरुषांसाठी तसेच मुली व महिलांसाठी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक दिले जाणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोफत टी-शर्ट देण्यात येणार आहे तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.. राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसनबैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.सर्वेक्षण आणि सरकारी लाभतृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशाराप्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात संभाव्य मोठा अपघात टळल्याची घटना आज घडली. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या मुंबई लेनवरील कि.मी. ४२.००० जवळील आयओडीशी बोगद्याजवळ सुमारे ५० फूट उंचीवर सुमारे ५ टन वजनाचा मोठा दगड संरक्षण जाळीत (रॉक फॉल बॅरियर) अडकून राहिल्याचे निदर्शनास आले होते. पावसाळ्याच्या तोंडावर हा दगड खाली कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांनी तातडीने परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, वाहतूक विभाग आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून तातडीची कारवाई हाती घेण्यात आली. या संदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण सांखळे यांनी विशेष आदेश जारी करून १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत संबंधित भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे दगड हटवण्याचे काम अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे शक्य झाले.या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे-मंडव, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, खंडाळा आणि वडगाव येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते, आयआरबी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि संरक्षक जाळी उभारणाऱ्या मेकाफेरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे साईट इंजिनिअर अक्षय परशिया व अभिजीत सावंत यांनी त्यांच्या तांत्रिक पथकासह ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.संपूर्ण कारवाईदरम्यान पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि तांत्रिक पथक यांच्या अचूक समन्वयामुळे कोणतीही जीवितहानी अथवा अपघात घडला नाही. दुपारी १.४० वाजेपर्यंत दगड सुरक्षितरीत्या खाली उतरवून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या संयुक्त आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे एक मोठा संभाव्य अनर्थ टळला असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांच्या सतर्कतेचे, कार्यतत्परतेचे आणि समन्वयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.