Breaking news
15 ऑगस्ट ला जोडून आलेल्या लॉंग वीकेंडला लोणावळ्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवा - नगरसेवक निखिल कवीश्वर यांची लोणावळा शहर पोलिसांकडे मागणी

ठळक बातम्या

लोणावळा

15 ऑगस्ट ला जोडून आलेल्या लॉंग वीकेंडला लोणावळ्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवा - नगरसेवक निखिल कवीश्वर यांची लोणावळा शहर पोलिसांकडे मागणी

लोणावळा : लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पर्यटकांसोबतच स्थानिक नागरिक देखील मेटाकुटीला आले आहेत. मागील काही आठवड्यांपासून वारंवार लोणावळा शहरामध्ये होत असलेली वाहतूक कोंड�

वाकसई येथील अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करण्याची हिंदू समितीची मागणी

लोणावळा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA च्या हद्दीतील वाकसई गाव, गट नं. 221, 222, 223 येथे अनधिकृतरित्या करण्यात आलेल्या बांधकामाबाबत PMRDA यांनी दि. 29 जुलै 2026 रोजी 15 दिवसांची नोटीस बजावली �

क्राईम-न्युज

पुणे ग्रामीण LCB ची मोठी कारवाई l लोणावळा परिसरात ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक; ७.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि एक हुंडाई आय-१० कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत कुसगाव येथील आयआरबी कार्यालय परिसरात एका कारमधून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित शुभम शर्मा हा कारमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची तसेच त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-१० (क्र. एमएच १४ बीके ७२३५) कारची झडती घेण्यात आली.झडतीदरम्यान पोलिसांना ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित शुभम शर्मा याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर यांनी सहभाग घेतला होता. लोणावळा व मावळ परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

मावळ

अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन ठाकर तर कार्याध्यक्षपदी रेखा भेगडे

वडगाव मावळ : क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवारी (९ ऑगस्ट) वडगाव मावळ येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. लोकमतचे वार्ताहर सचिन गोविंद ठाकर यांची मावळ तालुका अध्यक्षपदी, तर सतर्क महाराष्ट्र संपादिका रेखा भेगडे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विजय सुराणा, जेष्ठ पत्रकार ॲड. संजय पाटील, श्रीराम कुमठेकर, राजेंद्र काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकरी आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून मावळच्या जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रा. योगेश घोडके व मनोज दत्तात्रय गवळी यांची निवड तसेच खजिनदारपदी संतोष थिटे, पत्रकार परिषद प्रमुखपदी सुभाष भांडे यांची निवड करण्यात आली. प्रमुख सल्लागारपदी ॲड. संजय पाटील, ॲड. प्रफुल्ल सोनवणे तर प्रकल्प प्रमुखपदी दत्ता म्हाळसकर व गणेश वायकर यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणीचा ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विजय सुराणा, प्रा. महादेव वाघमारे, सचिन गोविंद ठाकर, सुभाष भांडे, मनोज मोरे, धनंजय नांगरे, अमीन खान, रेखा भेगडे, ॲड. संजय पाटील, योगेश घोडके मयूर सातपुते, महेंद्र ओव्हाळ, ॲड. प्रफुल्ल सोनवणे, संतोष थिटे, सचिन मोरे, सचिन चिपळगावकर, दत्ता म्हाळसकर, चंद्रकांत जोशी, रियाज शेख, दीपाली पारसकर, श्रीराम कुमठेकर, ॲड. निलेश अग्रवाल, गणेश वायकर, शिल्पा येवले, मनोज गवळी, रश्मी शिरस्कर, सुनील म्हस्के, रितेश भोमे, बापू बी. पाटील, शकिल बागवान, गणेश भेगडे, अनिष शेख, सुनील आढाव, राजेंद्र काळोखे आदी पत्रकार उपस्थित होते.

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने दरडग्रस्तांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला मंत्री महाजनांच्या तातडीच्या सूचना

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

विद्यार्थी नेतृत्व परिषदेचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न; लोकशाही मूल्ये, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे आवाहन

खोपोली (प्रतिनिधी) : प. पू. गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खोपोली येथे विद्यार्थी नेतृत्व परिषद २०२६–२७ चा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारी, सेवाभाव तसेच लोकशाही मूल्यांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.      खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन शांताराम हिरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर,  के.टी.एस.पी. मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अबूबकर जळगावकर, पी. पी. गांगगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष  दिनेश गुरव, विश्वस्त राजेश अभाणी आणि प्राचार्य डॉ. गौरव एन. तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.      कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वागत नृत्याने झाली. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी नेतृत्व परिषदेच्या पदग्रहण सोहळ्याला सुरुवात झाली. विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना बॅज व सॅश प्रदान करून त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकृतपणे सोपविण्यात आल्या. मास्टर सार्थक बाबासाहेब खोजे आणि कु. एलेना राजू इलंजीकल यांनी अनुक्रमे हेड बॉय आणि हेड गर्ल म्हणून पदभार स्वीकारला. तसेच मास्टर प्रेम अनिल भालेराव आणि कु. अनन्या महेश पाटील यांनी उपविद्यार्थी प्रमुख म्हणून पदग्रहण केले. याचबरोबर सांस्कृतिक, आरोग्य, वित्त व शिस्त मंत्री, विविध हाऊसचे कॅप्टन, उपकॅप्टन आणि प्रीफेक्ट्स यांनाही पदचिन्हे प्रदान करण्यात आली.      सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, जबाबदारी आणि सेवाभावाने आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन शांताराम हिरे यांनी विद्यार्थी नेतृत्व परिषद निवडणूक ही केवळ पदे निवडण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले.      ते म्हणाले की, “आजची तरुणाई देशाची दिशा बदलण्याची मानसिकता ठेवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे आणि लोकशाही मूल्ये जपण्याची शिकवण देणारे असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत.” विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांचा आदर करावा, शिस्त व नैतिक मूल्यांचे पालन करावे तसेच मिळालेल्या नेतृत्वाच्या संधीचा उपयोग स्वतःच्या विकासाबरोबरच इतरांच्या हितासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.      डॉ. गौरव तिवारी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना  विद्यार्थी नेतृत्व परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी परिधान केलेला बॅज हा अधिकाराचे नव्हे तर जबाबदारीचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, शिस्त आणि सेवाभाव या मूल्यांना आपल्या नेतृत्वाचा आधार बनवून इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.      विद्यार्थी नेतृत्व परिषद २०२६–२७ मधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नेतृत्वगुणांसोबतच जबाबदारी, शिस्त, सेवाभाव आणि लोकशाही मूल्यांची जडणघडण करणारा हा शपथविधी सोहळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Mavalmaza android application

Coming soon..