
Get in on
लोणावळा : ब्रह्मांडनायक, भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज यांचा पावन प्रकट दिन सोहळा लोणावळा शहरात विविध ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण �
लोणावळा : युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याअंतर्गत, शनिवार आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत दादा बारणे यांनी लोणावळा, कार्ला, पवन मावळ, वडगाव आणि देहूरोड येथे
लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 57 हजार किलो गोमांस जप्त केले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर संशयास्पद वाटणारे दोन कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 25 मार्चच्या मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत गोरक्षक संघटनांचाही सहभाग होता. तपासणी अहवालानंतर सदर मास गोमांस असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कसे पकडले गेले कंटेनर?मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून दोन एसी कंटेनर संशयास्पद येत असून त्यामध्ये गोवंशीय मास असल्याचा संशय पुण्यातील एका गोरक्षकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क साधत व्यक्त केला होता. त्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन कंटेनर संशयास्पदरित्या आढळून आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. स्थानिक गोरक्षक संघटनांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कंटेनर ताब्यात घेतले. प्राथमिक टप्प्यात वाहतूकदारांनी ते म्हशीचे मांस असल्याचे सांगितले आणि आवश्यक कागदपत्रे दाखवली, मात्र गोरक्षक संघटनांनी यावर आक्षेप घेतला आणि मांसाच्या प्रयोगशाळा तपासणीची मागणी केली. पोलिसांनी दोन्ही कंटेनरमधील मांसाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. 29 मार्च रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, हे मांस गोवंशीय असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.कोण आहेत आरोपी?लोणावळा ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद नोंदवली असून, कंटेनर क्रमांक MH 46 BM 9180 आणि MH 46 CU 9966 व चालक नदीम कलीम अहमद आणि नसीर मोहंमद अहमद (दोघेही राहणार न्हावाशेवा, नवी मुंबई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही वाहतूक मे. एशियन फूड्स मीन अँग्रो (न्यू भोईबुडा, सिकंदराबाद, हैदराबाद) या कंपनीच्या आदेशाने होत असल्याचे समोर आले आहे. कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले की, "गोमांस वाहतुकीबाबत कडक कारवाई करण्यात येईल आणि पुढील तपास सुरू आहे." हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक गोरक्षक संघटनांनी पोलिसांचे आभार मानत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे राज्यभरात गोमांस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यामध्ये सर्व गोरक्षक, गोसेवक, पोलीस प्रशासन, हिंदुत्ववादी संघटना, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोसेवा आयोग, प्राणी कल्याण अधिकारी कमिटी, हिंदु समिती लोणावळा व ग्रामीण परिसर, सर्व पक्षांचे पदाधिकारी, खोपोली येथील गोरक्षक, व सर्व सामान्य नागरिक, पोलीस प्रशासन यांच्या एकजुटीमुळे ही मोठी कारवाई झाली असल्याने लोणावळ्यातील गोरक्षक सदस्यांनी सर्वांचे आभार मानले आहे.
लोणावळा : "दहावी आणि बारावीचे वर्ष हे आयुष्यातील टर्निंग पॉइंट असून, जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर प्रयत्न केले तर अशक्य असे काहीही नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची ओळख करून योग्य करिअर निवडावे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवून अभ्यास करावा," असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक प्रा. मनीष पाटणकर यांनी केले. मार्च 2025 मध्ये दहावीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, "दहावीनंतर पुढे काय?" हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत श्री एकविरा देवी जोगेश्वरी, दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कार्ला परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबद्दल माहिती देत, स्वतःच्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास श्री एकविरा विवाह सोहळा समितीचे संस्थापक भरत मोरे, अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, किरण हुलावळे, बाळासाहेब येवले, साईनाथ मांडेकर, मुख्याध्यापक संजय वंजारे, संतोष मोरे, राजू बेदमुथा, बाळासाहेब डूबे, अनिल गायकवाड, अंकुश भानुसघरे, सुरज हुलावळे यांसह समितीचे सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी नगरपरिषद शहरास पिण्याचे पाणी पुरवठा करीत असून भामा आसखेड कुरुळी टँपिंग मधून आळंदीस मंजूर 10 एम.एल.डी कोठ्यातून सध्या 7 एम.एल.डी. पाणी उचलत आहे. वास्तविक आळंदीचा मंजूर कोठा 10 एम.एल.डी असताना तसेच पाण्याची प्रचंड मागणी असताना पाणी कमी उचलले जाते यातून आळंदीकरांत नाराजी आहे. आळंदीला नियमित पाणी पुरवठ्यास दोन स्वतंत्र पाईप लाईनसह पम्पिंग आणि साठवण टाक्यां उपाय योजने अंतर्गत तातडीने विकसित करण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे. या संदर्भात माजी नगरसेवक घुले यांनी आळंदी नगरपरिषदेस निवेदन देवून लक्ष वेधले आहे. आळंदी शहरास पिण्याचे पाणी गोपाळपुरातील पाणी पुरवठा केंद्रातून शुद्धीकरण केले जाते. येथून ते आळंदी हवेली येथील डोंगरा वरून पुन्हा आळंदी हवेली आणि आळंदी खेड येथील जलकुंभ भरत आळंदी शहरास देत असताना पाणी पुरवठा विलंबाने होतो. नागरिकांना नियमित पुरेशा प्रमाणात आणि उच्च दाबाने नियमित, रोज पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आळंदीत पाणी साठवण क्षमता वाढीसाठी दोन पाणी साठवण टाक्या, दोन जलकुंभ तात्काळ विकसित करण्याची आत्यानी व्यक्त केली आहे. पाणी शुद्धीकरणा नंतर ते आळंदी हवेली आणि आळंदी खेड यांना एकाच वेळी वितरित करण्यासाठी दोन स्वतंत्र तसेच पम्पिंग आणि स्वतंत्र जलनलिका पाईप लाईन चे काम हाती घेऊन प्राधान्याने जुनी जलशुद्धीकरण यंत्रणा, पम्पिंग व्यवस्था देखभाल दुरुस्ती करून वापर योग्य झाल्यास शहरास पाणी पुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले. यामुळे आळंदी खेड आणि आळंदी हवेली या भागात एकाच वेळी पाणी पुरवठा होऊन झोन देखील कमी होऊन नागरिकांना रात्री अपरात्री, उशीरा होणारा पाणी पुरवठा वेळेत तसेच विनाविलंब होण्यासाठी मागणी प्रमाणे तात्काळ उपाय योजना व्हाव्यात असे साकडे आळंदीकरांचे वतीने माजी नगरसेवक घुले यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन घातले आहे. प्रभाग क्रमांक 8 साठी पाण्याची आणि सांडपाणी ड्रेनेज लाईनची मागणी येथील प्रभाग क्रमांक 8 मधील नागरी सुविधा अभावी गैरसोय होत असल्याने हिंदवी कॉलनी क्रमांक 1 मध्ये पिण्याचे पाण्याची पाईप लाईन मागणी करण्यात आली आहे. नियमित पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी नवीन 3 इंची पिण्याचे पाण्याची लाईन नागरिकांचे सोयी साठी विकसित करून डोंगरा वरील नागरिकांना दिलासा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. याच प्रभागात साखरे महाराज पेट्रोल पंप ते देहू फाटा गजानन महाराज मंदिर समोरून लहान ड्रेनेज असल्याने पाणी सतत रस्त्यावर येऊन नागरिकांना गैरसोय होत आहे. घाण पाण्यातुन चालावे लागते. या मुळे नागरिकांत नाराजी वाढली आहे. यासाठी 2 फूट व्यास रुंदीची ड्रेनेज लाईन टाकल्यास ड्रेनेज तुंबून घाणीचे साम्राज्य दूर होण्यासाठी प्राधान्याने विकास कामे हाती घ्यावीत. अशी मागणी करीत प्रशासनांस खणखणत इशारा देत कामे न झाल्यास याच मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल असे घुले यांनी सांगितले. देहू आळंदी रस्त्यावरील ड्रेनेज लाईंनचे काम तात्काळ हाती घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहिदास कदम यांनी सांगितले. वारकरी भाविक या भागातून अनवाणी पायाने ये जा करीत असतात. मात्र सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्या वतीने ही सभा एस.एल. किर्लोस्कर इंटरनॅशनल कम्युनिकेशन सेंटर, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडली.या बैठकीस मा. डॉ. राजेंद्र भोसले (PMC आयुक्त), मा. श्री. जितेंद्र दुडी (जिल्हाधिकारी, पुणे), मा. डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार (विभागीय आयुक्त, पुणे) आणि मा. श्री. एस. जी. राजपूत (उद्योग सहसंचालक, उद्योग विभाग, पुणे) तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष श्री. संदीप संभाजी कोराड आणि उपाध्यक्षा श्रीमती शीतल अनिल पतंगे यांनी वसाहतीतील प्रमुख समस्यांचा आढावा घेतला. त्यांनी सभेमध्ये वसाहतीसमोरील अडचणी मांडल्या, ज्यावर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र दुडी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. ही सभा पुणे जिल्ह्यातील उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण ठरली असून, प्रशासन आणि उद्योजकांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊले असणार आहे.