Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

महत्वाची बैठक l केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषदेत 27 एप्रिल रोजी आढावा बैठक

लोणावळा : भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रविवार, 27 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता लोणावळा नगरपरिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्�

Lonavala News l पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षियांकडून जाहीर निषेध

लोणावळा : काश्मीर खोऱ्यामधील पहेलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 24 पर्यटक जखमी झाली आहेत. पहेलगा�

क्राईम-न्युज

Accident News l मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा येथे भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी

लोणावळा : मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी एका भरधाव वेगातील ट्रकचालकाने समोर जाणाऱ्या एका कारला मागून जोरात धडक दिली. सदर कार ही समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सागर पांडुरंग इंगुळकर (राहणार पुणे) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची फिर्याद दिली आहे.      लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक नंबर GJ 63 BT6701 हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाने भरधाव वेगात समोर जाणारी इनोव्हा कार नंबर MH 19 BG 8067 हीला मागून जोरात धडक दिली, त्या धडकेमुळे सदरची इनोव्हा गाडी समोरून येणारी एर्टिगा कार नंबर MH 12 UC 2800 हिला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रिया सागर इंगुळकर (राहणार शुक्रवार पेठ, टिळक रोड, पुणे), निलेष संजय लगड (वय 42 वर्षे), श्राव्या निलेश लगड (वय 12 वर्षे दोन्ही रा. सदशिवपेठ, पुणे) यांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर एर्टिगा कारमधील शस्यु, रूद्राक्ष, अषिका मोगल, आरव मोगल, अर्ष लगड, आरसित लगड यांना हाता पायाला व खांदयाला किरकोळ दुखापत झाल्या असून मुक्का मार लागलेला आहे. तर इनोव्हा कार मधील प्रवासी अष्वीनी रमेष जाडकर (वय 43 वर्षे), ओमकेश रमेश जाडकर (वय 22 वर्षे), सुमित तुकाराम कदम (वय 24 वर्षे), पुष्कार लक्ष्मण शेळकंदे (वय 25 वर्षे), जिगनेश रमेश जाडकर (वय 12 वर्षे), संजय नामदेव वाल्हेकर (वय 42 वर्षे), विमल नामदेव वाल्हेकर (वय 69 वर्षे सर्व रा. भिंवडी जि. ठाणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.     याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पुढील तपास करत आहेत.

मावळ

दर्जेदार विकासासाठी ठोस पावले: आमदार सुनील शेळके यांची DPDC बैठकीत ठाम भूमिका व महत्त्वाचे निर्णय

पुणे : पुणे जिल्ह्यातील विकासकामांचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या बैठकीत विकासकामांच्या गुणवत्तेवर ठाम भूमिका मांडत, ठोस उपाययोजनांची मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे विकासकामांची पारदर्शकता आणि दर्जा यावर विशेष भर देण्यात आला.उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १३७९ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला. विविध योजनांचा आढावा घेत, पुढील कामांसाठी दिशानिर्देश ठरवण्यात आले.महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :१५ लाखांवरीलच कामांना मंजुरी : जिल्हा वार्षिक योजनेत आता १५ लाख रुपयांपेक्षा अधिक निधीच्या कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे.थर्ड पार्टी ऑडिट सक्तीचे : विकासकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र तृतीय पक्ष संस्थांची नेमणूक केली जाणार आहे.क्रीडा साहित्य खरेदीत गुणवत्ता नियंत्रण : व्यायामशाळा आणि क्रीडा साहित्य खरेदीसाठी विशेष गुणवत्ता नियम लागू होणार.सौरऊर्जेला प्रोत्साहन : सर्व नवीन शासकीय इमारतींवर सौर पॅनेल बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, नव्या पाणीपुरवठा योजनाही सौरऊर्जेवर आधारित असतील.शैक्षणिक व अंगणवाडी इमारतींना टाईप प्लॅन : जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्या आणि अंगणवाडीं इमारतीसाठी साठी एकसंध टाईप प्लॅन तयार करून त्यासाठी वाढीव निधी मंजूर होणार.कामांचे व्हिडीओ दस्तऐवजीकरण : आता केवळ फोटोच नव्हे, तर ३० सेकंदांच्या व्हिडीओ क्लिप्सही बिल तयार करताना अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.स्थळ पाहणीवर आधारित अंदाजपत्रक : सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद विभागांना प्रत्येक कामासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश.विद्युत आणि वन विभागाला स्पष्ट निर्देश : विद्युत विभागाने दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण करावीत, तर वन विभागाने स्थानिकांच्या गरजांचा विचार करून विकासकामांना अडथळा आणू नये, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.या बैठकीत आमदार शेळके यांनी कामांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करत विकासात दर्जाचा आग्रह धरला. यापूर्वीही त्यांनी विधानसभेत याविषयी आवाज उठवला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच आता प्रशासकीय पातळीवर दर्जा राखण्यासाठी ठोस उपाय राबवले जात असल्याची चर्चा आहे. या निर्णयांमुळे पुणे जिल्ह्यातील विकासकामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेचे बंधन यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुविधांसाठी काटेकोर नियोजन करा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : आगामी आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी विविध शासकीय विभागांनी तातडीने नियोजन सुरू करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी दिले. “वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याला असुविधा होणार नाही, याची दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे निघणाऱ्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस उपायुक्त बापू बांगर, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रतिनिधी व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्राथमिक नियोजनावर भरडॉ. डुडी म्हणाले, “यंत्रणांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून नियोजन बैठका लवकर घेण्यात येत आहेत. आळंदी व देहू संस्थानकडून आलेल्या सूचना गांभीर्याने विचारात घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल.” पुढील बैठक मे महिन्यात घेण्यात येणार असून, याआधी संबंधित विभागांनी आपापल्या क्षेत्रातील तयारीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.सुविधांमध्ये मोठी वाढयावर्षी आरोग्य सेवा, शौचालये, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. फिरती ई-टॉयलेट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी खास संनियंत्रण यंत्रणा आणि मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. या टॉयलेट्सवर QR कोड लावण्यात येणार असून, वापरकर्ते थेट प्रशासनाला अस्वच्छतेची माहिती देऊ शकतील.तांत्रिक सोयी व वाहतुकीची योजनामोबाईल नेटवर्क अडचण येऊ नये म्हणून वारी मार्गावर नेटवर्क बूस्टर्स बसविण्यात येणार आहेत. तसेच पालखी मार्गस्थ असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन होणार आहे. अपूर्ण महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी NHAI ला सूचना करण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा अखंड राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.संपर्कासाठी समन्वय अधिकारी नेमणारकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा म्हणून संबंधित तालुक्यांमध्ये प्रांताधिकाऱ्यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे.उपस्थित मान्यवरबैठकीस जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विक्रमसिंह मोरे, वैभव मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, पुणे शहरच्या प्रांताधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, खेड प्रांताधिकारी अनिल दौंडे, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, दौंड प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Video News

अन्य बातम्या

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक इतिहास नसून युवकांसाठी प्रेरणास्थान - आ. शेखर निकम

संगमेश्वर/ प्रतिनिधी (विलास गुरव) : संगमेश्वर तालुक्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कसबा गावात उभारल्या जाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकास लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. या ऐतिहासिक स्मारकाच्या उभारणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार लवकरच कसबा-संगमेश्वर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे स्मारकाच्या कामाला आवश्यक त्या शासकीय मंजुरी व निधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.     या पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी आज स्वतः कसबा येथे स्मारकाच्या नियोजित जागेची सखोल पाहणी केली. त्यांनी कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, आणि कसब्यातील इतर पुरातन मंदिरांनाही भेट दिली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत संपूर्ण दौऱ्याचे काटेकोर नियोजन सुसूत्रतेने उभे केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा हा केवळ स्मारकापुरता मर्यादित नसून, त्यातून संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना, स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, तसेच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा दौरा म्हणजे एक सकारात्मक टप्पा असून, स्मारक हे केवळ इतिहासाची आठवण न राहता युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.     यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्रजी महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंटकर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विनोद म्हस्के, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मज्जित भाई नेवरेकर,  बाळ सर र्देसाई, सरपंच पूजा लहाने,  निबंध कानिटकर,  राजन कापडी, श्रीनिवास पेंडसे,  तहसीलदार अमृता साबळे मॅडम, बीडिओ भारत चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जाधव, पुरातन विभागाचे अधिकारी विलास बलसाठ,  आर्किटेक योगेश कासारे, पाटील  तसेच मुरलीधर बोरसुतकर, भाई पेंढारी, निकेत चव्हाण, राम शिंदे खालीद काजी, प्रवीण चव्हाण आदी ग्रामस्थ विविध खात्याचे अधिकारी, कार्यकर्ते व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक हे भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची जाण, संस्कृतीची जाणीव आणि प्रेरणा देणारे ठरेल. हा दौरा स्मारकाच्या उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, हे निश्चित. हा दौरा ऐतिहासिक ठरणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

Mavalmaza android application

Coming soon..