Get in on
लोणावळा : वलवण नांगरगाव मार्गावरील इंद्रायणी नदी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी लोणावळाकर नागरिक करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राठोड यांच्याश�
लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे, एसआरपी या घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार सं�
लोणावळा : लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने वडगाव मावळ येथे 1 मे च्या रात्री 1 वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 1 लाख 37 हजार 677 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली. याविषयी बोलताना आयपीएस कार्तिक म्हणाले, वडगाव मावळ येथे मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी (1 मे) रात्री 1.10 वाजता बातमीच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील केशवनगर भागातील एका खोलीमध्ये दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया (वय 21 वर्ष, राहणार केशवनगर, वडगाव) यांच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1 लाख 37 हजार 677 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीचा साथीदार तनविर शेख (राहणार केशवनगर, वडगाव मावळ) हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. सदरचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा.अंकुश नायकुडे, पो.हवा. नितेश कवडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.
मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून 2024 च्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले मुकेश मनोहर अगरवाल यांचा डिजिटल माध्यमातून जोरदार प्रचार मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. सोशल मीडिया व डिजिटल मीडिया यांचा प्रभावी वापर करत मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मुकेश अगरवाल हे करत आहे. कपाट हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून आपले निवडणुकीचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुकेश अगरवाल म्हणाले महाराष्ट्रातील मागील काही काळातील राजकारण पाहता मतदार हा सर्वच राजकीय पक्षांना व त्यांच्या भूमिकांना कंटाळला आहे. मतदारांना एक सक्षम असा पर्याय हवा असून माझ्या माध्यमातून तो पर्याय मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये देण्याचा प्रयत्न मी व माझ्या मित्र परिवाराकडून करण्यात आला आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मतदारांनी ज्यांना विश्वासाने मते दिली पुढील काही दिवसात त्यांनी विरोधकांसोबत हात मिळवणी करत घरोबा साधला. त्यामुळे मतदारांनी दिलेली मते ही वाया गेली आहे. यावेळी मात्र असा प्रकार घडू नये याकरिता मतदारांनी विचारपूर्वक राजकीय पक्षांना पर्याय म्हणून उपलब्ध असलेल्या अपक्ष व समाजासाठी सातत्याने काम करत असलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पर्याय निवडावा. मतदार संघातील प्रत्येक मतदारासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवत मावळ लोकसभा मतदारसंघात विकास करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.
मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली उमेदवारी आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांचा प्रचार सुरू असून ते मावळ लोकसभा मतदारसंघात घराघरात पोहोचले आहेत. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करत गद्दारांना घरी बसवण्याची ही निवडणूक असल्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरी येथील सभेत शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आलो आहोत. आमचा पक्ष व पक्षाचे चिन्ह चोरण्याचा प्रयत्न भाजपा व मिंदे यांनी केला आहे. ज्या शिवसेनेकडे संपूर्ण महाराष्ट्र व देश मराठी समाजाची अस्मिता म्हणून पहात होता. ज्या बाळासाहेबांचे आर्शिवाद घेऊन भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली. मोदी पंतप्रधान झाले, आम्ही त्यांना आलिंगन दिले व त्यांनी पाठीत वार केला. शिवसेनेला फोडण्याचे पातक भाजपने केले आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही. ज्या गद्दारांनी त्यांना साथ दिली त्या गद्दारांना गाडल्याशिवय हा महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही. अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ज्याप्रमाणे मोदी सरकार यांनी अचानकपणे नोटाबंदी करत चलनात असलेल्या नोटांची रद्दी केली त्याचप्रमाणे चार जूनच्या निकालानंतर मोदी नावाचे नाणे चलनातून बंद होईल व ते फक्त नरेंद्र मोदी म्हणून राहतील असा हल्लाबोल या सभेत ठाकरे यांनी केला आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सांगवी येथील पी.डब्लु. डी. मैदानावर (इंडिया) महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. मावळवासियांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत असलेली निष्ठा आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यावर असलेलं प्रेम ह्या सभेत स्पष्ट दिसून आलं. सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आप पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, शिवसेना संघटक व आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले आदीसह इंडिया - महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. संजोग वाघेरे हा विकासाचा ध्यास असलेला चेहरा असल्याने मावळ लोकसभा मतदार संघातील मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याकडे साधारणपणे भुताची भीती असते, भाजपाला पराभवाच्या भुताची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान गल्लीबोळात रोड शो करत आहेत. जनतेने आणले का नाही रस्त्यावर? शिवसेनेची भडकलेली मशाल हुकूमशाही मोदी सरकारचे आसन जाळून भस्मसात करेल. महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'भाजपसमोर 2014 व 2019 नंतर आता कोणतेच मुद्दे नाहीत. म्हणून हिंदू मुस्लिम असा जातीयवाद केला जात आहे. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग होता, असे सर्वोच्च न्यायालयातील एका माजी न्यायाधीशांनी सांगितले आहे. खरे तर हे गजनी सरकार आहे. कारण प्रत्येक वेळी वेगळे बोलताना, मागे काय बोलले होते त्याची त्यांना आठवण होत नाही म्हणून मागील दहा वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनांवर ते बोलायला तयार नाही. अग्निविरांच्या माध्यमातून त्यांनी जवानांच्या भविष्यांशी खेळण्याचे धोरण आखले आहे, संरक्षण विभागाचे कंत्राटीकरण केले जात आहे. त्यामुळे राम कृष्ण हरी अन पाठवा त्यांना घरी! असे जनताच म्हणत आहे. ठाकरे म्हणाले, मुबंईत गुजरातची कंपनी मुंबईमध्ये मराठी माणसांना प्रवेश नाही, अशी जाहिरात देते. ही कसली मानसिकता. आम्ही गुजराती बांधवांच्या विरोधात नाही, पण अशा मानसिकतेच्या विरोधात मराठी माणूस पेटून उठेल. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्यांना व शिवसेनेचे तुकडे करणाऱ्या गद्दारांना जनता आता माफ करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : मुंबई शहर व परिसरातील लोकसभेची निवडणूक पाचव्या टप्प्यांमध्ये 20 मे रोजी होणार आहे. त्या दिवशी व्यवसायकांनी आपल्या कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी. मतदान करणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असल्याने कामगार त्यापासून वंचित राहू नये याकरिता व्यवसायकांनी सहकार्य करावे असे आवाहन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी डॉक्टर दिनेश शर्मा यांनी केले आहे. नामदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील व्यवसायांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शर्मा उपस्थित होते. या बैठकीला हिरे व्यापारी व हिरे उद्योगपती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर दिनेश शर्मा म्हणाले, देशामध्ये पुन्हा मोदी सरकार येण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्यांनी व उद्योगपतीनी आपल्या कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावे तसेच त्यांचे मतदान करून घ्यावे. मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवण्यात यावा. मंगल प्रभात लोढा म्हणाले, देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक उद्योगपतींनी आप आपल्या क्षेत्रांमधील उद्योगपती त्यांचे कामगार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याबाबतची जागृती निर्माण करावी जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल व देशांमध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आपण संसदेमध्ये पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करू. समस्त महाराजांचे ट्रस्टी परेश भाई शहा यांनी सांगितले की, आम्ही आमचे सर्व सहकारी अहोरात्र काम करून भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले सर्व उमेदवार निवडून आणू. भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल म्हणाले, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे जास्तीत जास्त खासदार आणण्यासाठी मी व माझ्यासोबत सर्व उद्योगपती प्रयत्न करीत आहोत आणि या प्रयत्नामुळे मतदानाचा टक्का वाढेल. आम्ही सर्वजण महाराष्ट्रातले तसेच मुंबईतले भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्ष यांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल त्याची दक्षता घेऊ. राष्ट्रीय सेवक संघाचे किरीट भाई शहा यांनी सर्वांचे आभार मानले.