लोणावळा : लोणावळ्यातील विशाखा रवींद्र पालकर ही पुणे आयडॉल 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. पुण्यातील सनी विनायक लिम्हण यांच्या सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुणे आयडॉल 2024 चे आयोजन क�
लोणावळा : इंदिरानगर, न्यू तुंगार्ली येथील अशोक केशव मोहोळ यांचे आज वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा अविनाश मोहोळ, दोन मुली, पुतण्या विकी मोहोळ असा मोठा परिवार आहे.
लोणावळा : कुसगाव भैरवनाथनगर परिसरात शुक्रवारी (24 मे) रात्री व 22 ते 25 मे दरम्यान झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये तब्बल अडीच लाखांची रोकड व सोन्याचा ऐवज असा मिळून 6 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी दत्तात्रय शंकर गरवड (वय 40, रा. आयप्पा मंदिराशेजारी, भैरवनाथ नगर कुसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय गरवड हे 24 मे रोजी कुटुंबासह पांगोळी येथील फार्म हाऊस वर गेले असताना, त्यांच्या बंद घराचा सेफ्टी दरवाज्याचा कडी कोयंडा तोडत घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटातील दोन लाख रुपये रोख रक्कम व 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. तसेच त्यांच्या घराजवळ असलेल्या के. के. मार्केट शेजारील गोविंद अपार्टमेंट मधील मच्छिंद्र सुर्वे यांच्या तळमजल्यावरील घराच्या सेफ्टी दरवाज्याचा कोयंडा तोडत घरात प्रवेश करत त्यांच्या घरातील 50 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असे 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या दोन्ही घटनांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले घटनेचा तपास करत आहेत.
तळेगाव दाभाडे : कासारसाई धरणात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी (29 मे) दुपारी घडली आहे. मुरली कृष्णा बोला (वय 21, रा. कोरेगाव पार्क, पुणे; मूळ रा. आंध्र प्रदेश) आणि कुणाल सर्वेश दुबे (वय 21, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील एका महाविद्याल्यातील चार विद्यार्थी आज दुपारी कासारसाई येथील धरणावर आले होते. पाण्याचा आनंद घेण्यासाठी ते पाण्यात उतरले होते मात्र खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. इतर दोन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यश न आल्याने काही नागरिकांनी शिरगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली तसेच मावळ वन्यजीव रक्षक टीमला याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर बचाव पथकाने पोलिसांच्या समवेत कासारसाई धरणावर येत शोध मोहीम राबवली. साडेतीन वाजण्याच्या सुमारास बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी शिरगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी (21 मे) रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. परीक्षा दिलेल्या राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.या संकेतस्थळावर पाहता येतील गुणपत्रिकाविद्यार्थ्यांना दि. 21 रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजल्यानंतर 1) mahresult.nic.in2) http://hscresult.mkcl.org 3) www.mahahsscboard.in4) https://results.digilocker.gov.in या संकेत स्थळांवर निकाल आणि गुण पाहता येतील आणि गुणपत्रिकेची प्रतही (प्रिंट आउट) घेता येईल.
खोपोली (प्रतिनिधी) : रायगड जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीतल्या टाटा स्टील कंपनीमध्ये वायू गळती झाल्याची खबर आज दिली गेली. आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळता क्षणीच खालापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार आयुब तांबोळी, निवासी तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तात्काळ सर्व यंत्रणांना वायुगळती झालेल्या ठिकाणी रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार खालापूर तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा, खालापूर तालुका महसूल विभागाचे विविध अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, टाटा स्टील कंपनीचे अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी एम के म्हात्रे यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व यंत्रणाचे कौतुक केले. आणि अशाच पद्धतीने कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी सतर्क राहण्याचे आदेश दिले. खरं तर हे एक माॅकड्रील होतं. एखादी घटना घडल्या नंतर किती वेळात यंत्रणा घटना स्थळी दाखल होते, याची रंगीत तालीम यामधून घेण्यात आली. गेल्या काही दिवसात रसायनी, पातळगंगा, डोंबिवली, महाड इत्यादी ठिकाणी घडलेल्या अग्निप्रलय आणि वायूगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील यंत्रणा किती सतर्क आहेत याचा आढावा आणि अंदाज घेण्याचे दृष्टिकोनातून मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एम के म्हात्रे यांनी दिली.